मख़दुम सोसायटी व रहेमत सुलतान फौंडेशनतर्फे मोफत वह्यांचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी) – धार्मिक कामात जसे आपण मोठ्या मनाने बंधनकारक समजून जसे दान-पुण्य करतो, त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना व छोट्या शाळांना शैक्षणिक मदत करणे त्यांच्या समस्या सोडविणेही पुण्याचेच काम आहे, असे प्रतिपादन जिवन फौंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद यांनी केले.
मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, रहेमत सुलतान फाऊंडेशन व मराठा सेवा संघाच्यावतीने व धनेष बोगावत, शफकत सय्यद, प्रशांत बंडगर, डॉ शैलेंद्र खंडागळे, समीर धाराणी , प्रा. दिपा भालेराव , दिनेश मंजरतकर , संदीप दिवटे, सारिका रघुवंशी, सुरेश पवार आदी दानशूरांच्या सहकार्याने आलमगीर येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आरिफ सय्यद, युनूसभाई तांबटकर व राजा भैय्या यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद व राजाभैय्या, मुख्याध्यापिका शेख नसरीन जहुरुद्दीन, शेख जाकेरा, शेख शिरिन, तंबोली शगुफता आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना आरिफ सय्यद म्हणाले की, दिवसेंदिवस शैक्षणिक खर्च वाढत आहे. अशावेळी मोफत शालेय साहित्याचे वाटप गरजू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे म्हणून सर्व सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात हे कार्य करण्याची गरज असल्याचे नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद शाजीया यांनी केले. तर प्रास्तविक आबीद खान यांनी केले. आभार सय्यद रफत यांनी मानले.