प्रभाग क्र.2 नित्यसेवा सोसायटीत गार्डन कामाचा शुभारंभ
अहमदनगर (प्रतिनिधी) – आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी किती कार्यक्षम आहे, त्यावर त्या भागाचा विकास होत असतो. प्रभाग दोनमधील चारही नगरसेवक हे कार्यतत्पर असल्याने मनपा, आमदार, खासदार निधी अशा विविध योजनांचा माध्यमातून प्रभागातील प्रत्येक भागाचा विकास केला आहे. ज्या-ज्यावेळी माझ्याकडे येतात, तेव्हा काही तरी विकास कामांसाठीचा पाठपुरावा असतो आणि निधी उपलब्ध करुन घेत कामे पूर्ण करत आहे, ही प्रभागासाठी अभिमानाची बाब आहे. शहराच्या विकासात उपनगराचा मोठा वाटा राहिला आहे. नियोजनबद्ध विकास कामांमुळे हा भाग चांगलाच विकसित झाला आहे.
नागरिकांना सोयी-सुविधा देण्याबरोबरच शहराच्या वैभवात भर टाकणारे प्रकल्प उभे राहत आहेत. सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी नगरसाठी उपलब्ध करुन घेत अनेक वर्षांची प्रलंबित कामे मार्गी लावलीत व काही सुरु आहेत. नागरी सुविधाबरोबरच शहराचा सर्वांगिण विकास कसा होईल, याकडे लक्ष देण्यात येत आहे. प्रभाग दोनच्या विकासासाठी आपण सर्वोतोपरि सहकार्य करु, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग क्र.2 मधील नित्यसेवा सोसायटीतील ओपन स्पेसमध्ये गार्डन कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, रवी गुडा, आकाश कोदे, ओंकार मुदिगंटी, श्रीनिवास अरकल, चैतन्य सरगम, अनिल बुटला, तिरमलेश पासकंटी, निखिल शेलार, कमलेश तडका, ओम दोंता, अक्षय दुस्सा, शाम वल्लभदेशी, आनंद कारमपुरी आदि उपस्थित होते.
यावे़ळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके म्हणाले, आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चारही नगरसेवकांनी प्रभागातील प्रत्येक कॉलनीमधे नागरिकांना मुलभुत सुविधा देऊन प्रभागाचा विकास केला आहे. नित्यसेवा सोसायटीतील नागरिकांना गार्डन नसल्याची खंत खूप दिवसांची होती, आज ती पूर्ण होत आहे. या गार्डनचा विकास झाल्यास लहान मुला-मुलींसाठी खेळणी, ज्येष्ठसाठी बाकडे त्याचबरोबर झाडे, ओपन जीम असे सर्वांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
यावेळी नगरसेवक निखिल वारे म्हणाले, प्रभागाच्या विकासासाठी आ.संग्राम जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करुन दिल्याने अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली आहे. नित्यसेवामध्ये सुसज्ज असे गार्डनचे काम आता होईल. पदावर नसलो तरी नागरिकांच्या कामासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरमलेस पासकंटी यांनी केले तर आभार रवि गुडा यांनी मानले. कार्यक्रमास सिद्धांत सामलेटी, शिवम अरकल, शितल गुडा, शारदा आडेप, ऐश्वर्या पासकंटी, शशिकला दुस्सा, लक्ष्मण येमुल, संजय चिप्पा, पुष्पा तडका, देवीदास गुडा, श्रीमती मडून, वल्लभदेशी मावशी, मुदगंटी ताई व सोसायटीतील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.