मेहेरबाबा मुळे आमचे गाव जगाच्या नकाश्यावर गेले-आनंदराव शेळके

         अहमदनगर (प्रतिनीधी) –  मेहेरबादला अवतार मेहेरबाबा हे अरणगावला प्रथम आले होते त्याला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज मेहेरबाबा ट्रस्ट कामगार युनियन व बिगर युनियन कर्मचारी यांच्या वतीने सकाळी ७ वा गावातून मिरवणूक काढून समाधीवर सांगता झाली यामध्ये सजवलेल्या बैलगाडीमध्ये बाबाची प्रतिमा ठेवण्यात आली होती,वाद्याच्या गजरात या मिरवणुकीत ग्रामस्थ हि सहभागी झाले होते,मिरवणूक समाधीवर आल्यावर शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके यांनी तिचे स्वागत केले यावेळी शिवसेना अरणगाव शाखाप्रमुख आनंदास कलापुरे,संजय शिंदे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

 

           यावेळी बोलताना शेळके म्हणाले अवतार मेहेरबाबा मुळे आमचे गाव जगाच्या नकाश्यावर गेले आहे जगाला प्रेमाचीशांतीचीमानवतेची शिकवण देणारे व जगातील ८० देशात बाबांचे लाखो भक्त असून ते बाबांच्या शिकवणीचा प्रमाणे आपलं जीवन सुंदर,आनंदी करीत आहेत ते अवतार मेहेरबाबा आमच्या येथे राहिले व त्यांनी प्रेम आश्रम या ठिकाणी बनविला व समाधी या ठिकाणी बांधली हि गावासाठी खुप महत्वाची गोष्ट आहे.

 

            बाबांनी आपलं तत्वज्ञानमानवतेचा संदेश दिला तो मेहेराबाद येथून दुखितांचे अश्रू पुसण्यासाठीत्यांचें दुःख हलके करण्यासाठी जगभर प्रवास केलेल्या बाबांनी अखेरचा श्वास घेतला याच भूमीत बाबांची समाधी आहे त्यांचे वास्तव्य असलेली कुटी,त्यांच्या वस्तूंचे संग्रहालयवाचनालय असं खूप काही जतन आहे येथे आज विविध देशांतील अनेक भाविक,अनुयायी येथे येतात,रहातात श्रद्धापूर्वक सेवा करतात.

 

           येथील दीन,दुबळ्यादलितांची सेवा करणारे बाबा,एक संतमहात्मा,साक्षात्कारी पुरुष इथल्या भूमीवर मनस्वी प्रेम करणारे बाबा होते तसे अरणगाव हे मागासलेलं आणि दुर्लक्षित खेडं होतं. बरोबर शंभर वर्षांपूर्वी४ मे १९२३ रोजी अवतार मेहेरबाबांचा चरणस्पर्श या गावाला झाला आणि त्याचं भाग्य फळफळलं. अवतार मेहेरबाबांच्या अरणगावमधील आगमनाची शताब्दी विविध कार्यक्रमांनी मेहेराबादला साजरी होत आहे यामध्ये आम्ही ग्रामस्थ पण सहभागी  आहे.

 

          अवतार मेहेरबाबा यांचा जन्म पुण्याचा,पण अवतार कार्यासाठी त्यांनी अरणगावची भूमी निवडली,शिर्डीचे साईबाबा,साकुरीचे उपासनी महाराज यांच्या भेटीनंतर मेहेरबाबांच्या अलौकिक कार्याला सुरूवात झाली.नगरमधील खुश्रो इराणी यांच्याकडे मेहेरबाबा आलेतेव्हा ते अवघ्या २९ वर्षांचे होते.मे महिन्यातील रखरखत्या उन्हात आपल्या ५-७ अनुयायांना बरोबर घेऊन मेहेरबाबा पायी चालत नगरहून अरणगावला आले. रस्त्याच्या कडेला असलेल्या कडूनिंबाच्या झाडाखाली सावलीत ते थांबले. 

          पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांची मोठी छावणी इथं होती.ज्या जागेत युद्धाचे विचार सुरू असत,तिथं असीम शांतता मेहेरबाबांनी अनुभवली.त्यांनी ठरवलं हीच असेल आपली कर्मभूम.ब्रिटिशकाळातील पोस्ट ऑफिस आणि मेसच्या इमारतीची डागडुजी करून राहण्याची व्यवस्था तिथं करण्यात आली.दौंड-मनमाड रेल्वेलाईनशेजारी मेहेराबाद नावाचा फलक उभारण्यात आला. व मेहेराबाद हीच त्यांची कर्मभूमी बनली. 

         मेहेराबाद बरोबरच शहरातील या ठिकाणावरही होता अवतार मेहेर बाबांना प्रेम 

      बंद पडलेली दीपाली टॉकीज ब्रिटिश काळातील सरोश टॉकीज च्या पाठीमागे झेंडीगेट  अहमदनगर शहरातील या भागात असलेले मेहेर बाबा यांचे सेंटरलाही खूप महत्व आहे. मेहेराबाद सोबत अवतार मेहेरबाबा यांना आवडणारा स्थान म्हणजेच हा सरोश पेट्रोल पंप मागे असलेला त्यांचा आताचा मेहेर सेंटर याठिकाणीही बाबांनी  आपल्या जीवनातील अनेक महत्वपूर्ण दिवस व्यतीत केले आणि याठिकाणीहि आपल्या सर्व देश विदेशातील अनुयायी आणि भक्तांना अध्यत्माचे धडे दिले आणि मेहेरबाबांच्या इतिहासातून अहमदनगर शहरातील या केंद्राचा इतिहास काढून टाकता येणार नाही त्यामुळे जगभरातील त्यांना मानणाऱ्या भाविकांच्या माहितीसाठी कि शहरातील मध्यवस्तीतीतलं तरीही अत्यन्त शांती आणि एकाग्रता मिळवून देणारा हा दीपाली टॉकीजच्या मागील केंद्र अवतार मेहेर बाबांच्या आठवणींनी आणि त्यांच्या जिवनातील विविध स्मृतींनी अजरामर झालेले आहे . 

दीनदलितांच्या मुलांसाठी शाळा,मोफत दवाखाना,तसंच कुष्टरूग्ण आणि मनोरूग्णांसाठी आश्रम याच भूमीत त्यांनी सुरू केला.तब्बल ४४ वर्षे चाललेल्या मेहेरबाबांच्या महामौनाला याच परिसरात बांधलेल्या झोपडीतून सुरूवात झाली.वयाच्या ७५ व्या वर्षी मेहेराबादच्या टेकडीवर अवतार मेहेरबाबा कायमचे विसावले.ऐंशीहून अधिक देशांतील सर्व जाती,धर्मांचे,विविध भाषा बोलणारे मेहेरप्रेमी मौनाची एकच भाषा आत्मसात करत त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी इथं येत असतात.