भाजपाच्या हर घर तिरंगा अभियानामध्ये जिजाऊ फाऊंडेशनमध्ये तिरंगा वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी) |
भारतीय जनता पक्ष, शहर जिल्हा व्यापारी आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार शहरात हर घर तिरंगा-घर घर तिरंगा हे अभियान सुरु केले असून शहरात त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. आज सिताबन लॉन,मार्केट यार्ड रोड येथे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते जिजाऊ फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांना तिरंगा भेट देण्यात आला.
यावेळी संजय गुगळे, मनीषा गुगळे,भाजपाचे सरचिटणीस सचिन पारखी ,प्रशांत मुथ्था व सचिन पारखी,व्यापारी आघाडीच्या अध्यक्ष महेश गुगळे,सरचिटणीस हर्षल बोरा,कार्यक्रम प्रमुख नीरज राठोड,राहुल जामगावकर, रूपेश वर्मा,प्रशांत बोऱ्हाडे ,सुरेश लालबागे आदींसह जिजाऊ फाऊंडेशनच्या २०० सदस्य व व्यापारी आघाडीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना आगरकर म्हणाले पूर्वी तिरंगा ध्वज साठी आचारसंहिता होती , अनेक नियम होते पण पंतप्रधान मोदी साहेबामुळे हार घर तिरंगा अभियान सुरु झाल्यामुळे आपण ५ दिवस झेंडा लावू शकतो यामुळे राष्ट्रभक्ती जागृत होऊन समाज सुदृढ झालेला आपणास पाहायला मिळणार आहे.
मनीषा गुगळे म्हणायला जिजाऊ फाऊंडेशन मार्फत आम्ही विविध उपक्रम राबवत असून सिताबन लॉन या ठिकाणी रोज शारीरिक मानसिक-व्यायाम करून घेतला जात आहे,१५ ऑगस्ट आम्ही दरवर्षी साजरा करतो यावर्षी स्नेहालयात साजरा करणार आहोत व आपण सर्वाना तिरंगा ध्वज दिल्यामुळे आम्हाला आंनद झाला आहे.
यावेळी बोलताना महेश गुगळे म्हणाले देशभरात ‘हर घर तिरंगा’ हि मोहीम 9 ते15 ऑगस्ट या काळात देशभरात मोहीम राबवण्यात येत आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरील डीपी बदलून भारतीय ध्वज ठेवला आहे.यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांनाच असे करून हर घर तिरंगा चळवळ एक संस्मरणीय लोकचळवळ बनवण्याचे आवाहन केले आहे.
त्यास नगरकरांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे शहरात सर्व ठिकाणी तिरंगा वाटप केले जाणार असून विविध स्वयंसेवी संस्था ,ऑफिसे येथे जाऊन विविध कार्यक्रम घेणार आहोत ,प्रत्येकाने १५ ऑगस्ट रोजी आपल्या घरावर तिरंगा लावावा असे आवाहन त्यांनी भाजपच्या वतीने केले