Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबाराचे उदघाटन

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबाराचे उदघाटन

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबाराचे उदघाटन



अहमदनगर (प्रतिनिधी) – मौजे वडगाव गुप्ता येथे  प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर महविद्यालय  राष्ट्रीय सेवा योजनेच्या  हिवाळी विशेष शिबाराच्या आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे स्वयंसेवक व गावचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

       प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच विजयराव शेवाळे म्हणाले की, गावाच्या विकासात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे योगदान महत्वपूर्ण असते. स्वयंसेवक जेव्हा गावात प्रत्यक्ष श्रमदान करत असतात तेव्हा नकळत गावातील तरुणांना प्रशिक्षण देत असतात आणि श्रमदानाचे महत्व ही पटवून देतात तसेच याकाळात सध्यांकाळी होणारे सांस्कृतीक कार्यक्रमाद्वारे  गावातील नागरीकांना परिसर  स्वच्छता , सामाजिक जनजागृती राजकीय जनजागृती, मोबाईलचे दुष्परिणाम आणि  महाविद्यालयीन रॅगिंग या सारख्या आधुनिक प्रश्नावर प्रकाश टाकतात . यामुळे हे प्रश्न  वेगळा  विचार  करण्यास भाग पाडतात . यामुळे  ग्रामविकासला गती मिळते या प्रश्नांची तिव्रता समजण्यास मदत होते असे प्रतिपादन केले .

           या कार्यक्रमाचा  अध्यक्षीय समारोप करतांना  अहमदनगर महाविद्यालयांचे उपप्रचार्य नोएल पारगे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गावा मध्ये विविध विषयावर जनजागृती करणे आवश्यक आहे. गावातील लोकांनी विविध विकास योजना बद्दल माहिती देणे,  नागरीकांनी स्वतः कार्यक्रमात  सहभाग नोंदवावा , विविध व्यक्तिमत्व विकास शिबीरांचे आयोजन , पुस्तक बँक ,शेतीविकास बाबत नवीन ॲप त्याचा वापार  व शेती करण्याच्या नवीन पद्धती व  नविन तंत्रज्ञान आणि विद्यार्थींना झाडे दत्तक देणे या साख्या उपक्रमा बाबत आवगत करावे अशी भावना व्यक्त केली .

           या कार्यक्रमास ए .एस . एस . ई टी आय समन्वयक प्रा .डॉ . गोकुळदास गायकवाड , आशोक शेवाळे , ताराचंद डोंगरे  हे गावकरी  उपस्थित होते.

या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा .डॉ  भागवत परकाळ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाधिकारी  प्रा .डॉ . पोपट शिनारे यांनी केले .आभार  प्रा .डॉ  रविंद्र मते यांनी मानले.

       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी पवजीत छाबडा , प्रा डॉ  प्रा .डॉ  प्रबंधिका शेलार  , प्रा . सचिन बोरुडे प्रा . डॉ सचिन मोरे , प्रा .डॉ . पराग आठवले .प्रा . पुष्कर बिबवे, शबीना शेख, श्रद्धा कांबळे नमिशा बंडोलो, ऐश्वर्या सागडे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंम सेवक यांनी प्रयत्न केले.