Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात एक दिवशीय उद्योजक विकास उद्बोधन शिबिर व प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
Ahmednagar College: अहमदनगर (प्रतिनिधी) – परग्रहावर वस्ती करण्यासाठी, अमरत्वासाठी तसेच उद्योजकता व आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरदान आहे. आत्मनिर्भर भारतासाठी स्टार्टअप व उद्योग उभारणीत एआय व रोबोटिक्स अपरीहार्य गरज आहे. एआय व एडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान मानवी जीवन सुखकारक बनवित आहे, मात्र आळशी व कामचुकार लोकांचा रोजगार संपवित आहेत असे प्रतिपादन तंत्रज्ञान अभ्यासक व नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) च्या क. का वाघ वरीष्ठ महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागाचे प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले.
विद्यार्थी विकास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ , बी. बी. ए.विभाग आणि उद्योजकता विकास केंद्र भा . पां . हिवाळे शिक्षण संस्थेचे , अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर यांच्या वतीने एक दिवशीय उद्योजक विकास उद्बोधन शिबिर व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डॉ. भा. पा. हिवाळे एज्युकेशन सोसायटीचे अहमदनगर महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास मंडळ, बीबीए विभाग यांच्यातर्फे, प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित एकदिवसीय उद्योजकता कौशल्य विकास व परीक्षण कार्यशाळेचे उद्घाटक व प्रमुख व्याख्याते म्हणून “उद्योजकता कौशल्य विकासात कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स ची भुमिका” या विषयावर प्रा. किरणकुमार जोहरे बोलत होते.
स्टार्ट अप म्हणजे काय? स्टार्टअप कसे सुरू करावे? स्टार्टअप सुरू करत असतांना येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात, आत्मनिर्भर भारतासाठी युनिकॉर्न स्टार्टअप वाढविण्याचे मार्ग आदींबद्दल त्यांनी सखोल माहिती रंजक पद्धतीने दिली. तसेच एलएलपी म्हणजे लिमिटेड लायबिलिटीज भागीदारी, उद्योगाचे विविध प्रकार, उद्योगांची संरचना व व्यवस्थापन याबद्दल विस्तृत सांगितले. विविध उद्योगांमध्ये नैसर्गिक बुद्धिमत्तेबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स तसेच इतर एडव्हान्सड इलेक्ट्रॉनिक्स व विविध प्रकारचे तंत्रज्ञान कसे वापरावे हे देखील औद्योगिक स्वानुभवाने प्रा किरणकुमार जोहरे यांनी तांत्रिक सत्रात प्रात्यक्षिकांसह सांगितले.
कार्य शाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई येथील एसआयईएस ग्रॅज्युएट स्कुल ऑफ टेक्नॉलॉजी नेरूळच्या प्रा. डॉ. संध्या भारंबे या होत्या . त्यांनी उद्योग उभारणीत संवाद कौशल्य व इतर तांत्रिक कौशल्य प्राप्त करता येईल अशा विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांची व संकेतस्थळांची माहिती या कार्यशाळेत दिली.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी दिली. या कार्यशाळेत ‘ माय अर्थ माय बिझनेस’ या नवउद्योजक संवाद व मार्गदर्शन गटाची स्थापना देखील या कार्यशाळेत झाली.
प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. भागवत परकाळ यांनी तर परीचय पाहुण्यांचा सुत्रसंचालन कु. सुदानी पोताणी हीने केले.तर आभार डॉ सावने सर यांनी केले . तांत्रिक सहाय्य वैभव वाबळे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. दिलीपकुमार भालसिंग उपस्थित होते. बीबीए विभाग प्रमुख प्रा डॉ. तुषिता राज्या आय्यर, प्रा. डॉ. विठल कवडे, प्रा. डॉ. सनी रुपवते, प्रा. यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले . अनुदान विभागाचे समन्वयक डॉ सय्यद रज्जाक, उपप्राचार्य नोयाल पारगे, उपप्राचार्य प्रीतमकुमार बेदरकर रजिस्टर पिटर चक्रनारायण यांचे सहकार्य मिळाले.