Ahmednagar Corporation | अहमदनगरचे नाव बदलण्याबाबत अंतिम अधिसूचना आलेली नसताना
अहमदनगर । दर्शक :
अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांनी अहमदनगर शहराचे नाव बदलण्याबाबत शासनाकडून अंतिम अधिसूचना आलेली नसताना परस्पर अहिल्यानगर महानगरपालिका असे नाव केले आहे केल्याबाबत चौकशी होऊन कारवाई होण्याबाबत सामाजिक कार्यकर्ता शाकीर शेख यांनी तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीत त्यांनी म्हंटले कि
राज्य शासनाने अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यताच्या अनुषंगाने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवलेले होते त्यास केंद्रीय गृह विभागाने नाव बदलण्याबाबत ना हरकत दिलेली असून त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना प्रसिद्ध केलेले आहे परंतु सदर अधिसूचनेचे अनुषंगाने शासनाच्या महसूल विभागाकडून प्रारूप अधिसूचना प्रसिद्धी करून त्यावर नागरिकांचे हरकती मागवण्यात येत असून त्या हरकती विभागीय आयुक्त महसूल नाशिक यांच्याकडे दाखल करण्या सूचित करण्यात येते
परंतु अजून शासनाकडून नैसर्गिक न्याय तत्त्वाचे अनुषंगाने नागरिकांना आपल्या हरकती दाखल करण्याची संधी आलेली नसताना कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना फक्त सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्धी करण्यात आलेले आधी सूचनाचे अनुषंगाने ते अधिसूचना अंतिम समजून आयुक्त यांनी त्याची बेकायदेशीर अमोल सुरू केलेले आहे अजून हरकतीचे संधी देण्यात आलेली नाही
महसूल विभागाकडून प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करून जनतेला आपल्या सादर करण्याची संधी देण्यात येते त्यानंतर हरकतीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी सुनावणी घेऊन आपल्या स्पष्ट अभिप्रायस शासनाकडे अंतिम अहवाल सादर केल्यानंतर महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या तरतुदीचे अनुषंगाने नाव बदलण्याबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर
मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग
नाव बदलल्याचे कायदेशीर रित्या समजण्यात येते मात्र शासनाकडून कोणत्याही प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केलेल्या नसताना मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून अहमदनगर महानगरपालिकेच्या जुन्या इमारती वर अहमदनगर हे नाव खोडून त्या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिका असे नाव नमूद केलेले आहे सदरची बाब हे अतिशय गंभीर व मा उच्च न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करणारे आहे औरंगाबाद या शहराचे व जिल्ह्याचे नाव बदलण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अशीच अधिसूचना प्रसिद्ध केली होती
त्या अनुषंगाने सर्व शासकीय व निम शासकीय कार्यालयाने औरंगाबादच्या ठिकाणी छत्रपती संभाजी नगर असे नाव नमूद केले होते मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथे एका याची करतांनी याची का दाखल करून सदरची बाब उच्च न्यायालयाचे निदर्शनाने दिलेली होती न्यायालयाने त्याची गंभीरपूर्वक दखल घेऊन जिल्हाधिकारी यांना आदेश केले होते जोपर्यंत महसूल विभागाकडून अंतिम अधिसूचना प्रसिद्धी होत नाही वापरण्यात यावी असे आदेश केले होते व त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र आदेश पारित करून जोपर्यंत
डांगे यांची विभागीय चौकशी होऊन त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी
अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत पूर्वीचे नाव वापरण्यात यावी असे कळवलेले होते मात्र अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री यशवंत डांगे यांनी अहमदनगर महानगरपालिकेच्या जुने इमारतीच्या ठिकाणी अहमदनगर नाव हे खोडून अहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर असे फलक लावण्यात आलेले आहे सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून नियमाचे उल्लंघन करणारी आहे सदर घटनेचा मी जाहीर निषेध करतो व आपणास विनंती करण्यात येते की श्री डांगे यांची विभागीय चौकशी होऊन त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी आयुक्त यांना शासन स्तरवरून तात्काळ आदेश देऊन जोपर्यंत महसूल विभागाकडून अंतिम अधिसूचना प्रसिद्धी होत नाही तोपर्यंत नाव बदलण्याबाबत ची कार्यवाही करू नाही अहमदनगर महानगरपालिका अशीच नाव वापरण्यात यावी तसे आदेश देण्यात यावी हे विनंती