Ahmednagar Lawyers: वकिलांच्या महामोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद ; वकील संरक्षण कायदा मंजूर करा वकिलांची मागणी

Ahmednagar Lawyers अहमदनगरमध्ये वकिलांचा महामोर्चा ; सरकारला दिला इशारा, आमदार थोरात, आ.  कानडे,  आ.  जगताप  सहभागी

Ahmednagar Lawyers अहमदनगरमध्ये वकिलांचा महामोर्चा ; सरकारला दिला इशारा, आमदार थोरात, आ.  कानडे,  आ.  जगताप  सहभागी


अहमदनगर (प्रतिनिधी)  वकिलांवर होणार हल्ले थांबबेत, राहुरी येथील वकील दाम्पत्याची हत्या करणार्‍या आरोपींना मोक्का लावा, हा खटला जलदगती कोर्टात चालवून उज्वल निकम यांची यासाठी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी या मागण्यासाठी  शहर वकील संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वकीलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महा मोर्चा काढला. या मोर्च्यात हजारोंच्या संख्येने सर्व तालुयातील वकील सहभागी झाले होते.


जिल्हा न्यायलया पासून पायी निघालेल्या या मोर्च्यात सहभागी झालेल्या वकिलांनी एक वकील लाख वकील…., अ‍ॅडव्होकेट प्रोटेशन अ‍ॅट लागू झालाच पाहिजे… अशा जोरदार घोषणा यावेळी दिल्या. यावेळी शहर वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश गुगळे यांच्या सह सर्व तालुयांच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन दिले. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ.लहू कानडे, आ.संग्राम जगताप हे पायी या मोर्च्यात सहभागी झाले होते.

Ahmednagar Lawyers: वकिलांच्या महामोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद ; वकील संरक्षण कायदा मंजूर करा वकिलांची मागणी



जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा आल्यावर गेटवरच मोर्चा अडवण्यात आला. यावेळी वकिलांनी आक्रमक भूमिका व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी शहर वकील संघटनेचे सचिव अ‍ॅड.संदीप शेळके, उपाध्यक्ष अ‍ॅड.महेश शेडाळे, महिला सहसचिव अ‍ॅड.भक्ती शिरसाठ, खजिनदार अ‍ॅड. शिवाजी शिरसाठ, सह सचिव अ‍ॅड.संजय सुंबे, कार्यकारणी सदस्य अ‍ॅड. अमोल अकोलकर, अ‍ॅड. सारस क्षेत्रे, अ‍ॅड.विनोद रणसिंग, अ‍ॅड. देवदत्त शहाणे, अ‍ॅड. शिवाजी शिंदे, अ‍ॅड.रामेश्वर कराळे, अ‍ॅड. अस्मिता उदावंत आदींसह माजी पदाधिकारी, सर्व तालुका असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.


वकिलांची हत्या, मानवतेला काळिमा :  माजी मंत्री बाळासाहेब थोरात 

वकील दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. संगमनेर बार असोसिएशनचा मी जीव सदस्य आहे. त्यामुळे वकिलांच्या मागण्यांना माझा पाठिंबा आहे. वकिलांवर वारंवार होणार्‍या हल्ल्यामुळे वकिल बांधवांमध्ये भितीचे वातावरण आहे. वकिल बांधवांच्या मोर्चात आ. थोरात यांनी सहभाग घेत मागण्या मान्य करण्याची मागणी केली.


अट्टल गुन्हेगारांवर कारवाईची गरज ; आमदार संग्राम जगताप

राहुरी शहरातील वकील दांपत्याचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली. ही निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी धाडसी कारवाईची करण्याची खरी गरज आहे तसेच वकील दांपत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा, सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच लवकरच वकिलांचा प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात लेखी स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करणार आहे.

Ahmednagar Lawyers: वकिलांच्या महामोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद ; वकील संरक्षण कायदा मंजूर करा वकिलांची मागणी


 सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीच पोलिसांनी कारवाया केल्या असत्या तर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नसत्या, समाजविघातक लोकांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे, या घटनेचा निषेध करत वकिलांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडणार असून तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख असून या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.


Ahmednagar Lawyers: वकिलांच्या महामोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद ; वकील संरक्षण कायदा मंजूर करा वकिलांची मागणी