Ahmednagar NCP: मुले शिकली तरच पुढचे भविष्य चांगले आहे-आ संग्राम जगताप

 मुले शिकली तरच पुढचे  भविष्य चांगले आहे-आ संग्राम जगताप 

Ahmednagar NCP: मुले शिकली तरच पुढचे भविष्य चांगले आहे-आ संग्राम जगताप







अहमदनगर (प्रतिनिधी) 

        आज शिक्षण व्यवस्थेत दोन भाग पडले आहे एकीकडे भरमसाठ फी भरून शिक्षण घेणारे विदयार्थी तर दुसरीकडे शाळेतील मुलांना ड्रेस व चपला वह्या घ्यायला पैसे नाहीत. अशा परिस्थितीत समाजातील या गरजू विध्यार्थ्यांची जानवी ठेऊन त्यांना ते दिले जात आहे.हि मुले शिकली तरच पुढे आपले भविष्य चांगले आहे असे प्रतिपादन आ संग्राम जगताप यांनी केले.  



             सिद्धार्थनगर मधील पंचशील विद्यामंदीर मधील सर्व विध्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या वतीने वह्या शिवसेनेचे दलित आघाडी  प्रमुख  पोपटराव  पाथरे यांनी लोकसहभागातून ड्रेस व एक दानशूरांनी मुलांना चपला दिल्या.त्याचे वाटप आ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी अविनाश घुले,प्रा माणिक विधाते,सागर गुंजाळ,अंकुश मोहिते,गुलाब गाडेसंस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड,दलित आघाडी शिवसेना प्रमुख पोपटराव पाथर ,जिल्हा शिवसेना उपप्रमुख  आनंदराव शेळके,सिद्धार्थनगर शाखा अध्यक्ष  पांडुरंग घोरपडे,प्रा जयंत गायकवाड,दीपक लोंढे,गणेश गायकवाड,मयूर बांगरे,शेखर उंडे  साहेबराव काते,सुनील सकट आदींसह विद्यार्थीशिक्षक उपस्तित होते,   


         सुरेश बनसोडे म्हणाले सण,उत्सवात आपण गरीब व गरजू विद्यार्थ्यांची आठवण ठेवली पाहिजे या हेतूने आम्ही असे उपक्रम राबवत असतो,पुढे जाऊन हे विद्यार्थी जेव्हा चांगल्या पदावरकाम धंद्यांना लागतील तेव्हा ते जाणीव ठेऊन  अशा विद्यार्थ्यांना मदत करतात,समाजातील सर्व घटकातील लोकांनी अशी मदत जेथे असे मुलांना गरज असेल तिंथे करावी असे आवाहन त्यांनी केले