Ahmednagar Vatchnalay | “अभिजात मराठीचा” साहित्यिक आनंदोत्सव
अहमदनगर – दिनांक 5-ऑक्टोबर- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल अहमदनगर मधील साहित्यिक मंडळींनी आनंदोत्सव साजरा केला .अहमदनगर जिल्हा वाचनालय सावेडी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने सावेडी वाचनालयात काल छोट्याखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात साहित्यिकांची मांदियाळी आली.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष किशोर मरकड, कार्याध्यक्ष डॉ. चं. वि. जोशी ,वाचनालयाचे उपाध्यक्ष दिलीप पांढरे, संचालक तन्वीर खान, प्रा. ज्योती कुलकर्णी ,शिल्पा रसाळ, अजित रेखी , महाराष्ट्र साहित्य परिषदेचे केंद्रीय सदस्य चंद्रकांत पालवे,, साहित्य परिषदेचे शाखा उपाध्यक्ष दशरथ खोसे, सदस्य पोपटराव धामणे ,
ज्ञानदेव पांडुळे, सिनेट सदस्य शिवाजी साबळे, ज्येष्ठ कवी अरविंद ब्राह्मणे, प्रा. रवींद्र देवढे, गणेश भगत, प्राचार्य सुभाष लवांडे , ,डॉ. दत्ता पवार , अंबिका महिला बँकेच्या संचालिका आशाताई मिस्किन ,बेबीताई गायकवाड, अरविंद ब्राह्मणे ,माजी सिनेट सदस्य शिवाजी साबळे, गणेश भगत ग्रंथपाल अमोल इथापे ,सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताल ,आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष किशोर मरकड यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र शासन व पाठपुरावा केल्याबद्दल राज्य शासनाच्या अभिनंदनचा ठराव मांडला तसेच यासाठी जी समिती करण्यात आली होती त्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे व समितीच्या अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला तो सर्वांनी काळाच्या गदरात समत केला. नंतर महाराष्ट्र साहित्य परिषद या साहित्याच्या सेवेसी संबंधित असलेल्या संस्थेने यासाठी घेतलेले परिश्रम अतुलनीय आहे त्यांच्या सर्व मंडळींनी घेतलेल्या प्रयत्नांमुळेच आज ही यश आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वाचनालयाचे अध्यक्ष शिरीष मोडक यांनी यावेळी बोलताना पूर्वापार असंख्य साहित्यिक व साहित्याने मराठी भाषा समृद्ध आहे. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिची व्याप्ती आणखी वाढेल. देशभरातील असंख्य विद्यापीठात मराठी भाषा अभ्यासक्रमात येणार असल्याने त्याचा प्रचार व प्रसार निश्चितपणे वाढणार आहे. ही घटना ऐतिहासिक व प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमानास्पद असल्याचे सांगितले .
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अहमदनगर शाखेचे अध्यक्ष किशोर मरकड यांनी यावेळी” मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल या कामी कार्याध्यक्ष डॉक्टर चं .वी.जोशी यांनी याप्रसंगी बोलताना “संत ज्ञानेश्वरांच्या पावन भूमीत मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा ही अभिमानास्पद व आनंदाची गोष्ट असल्याचे सांगितले . अभिषेक दर्जा हा खऱ्या अर्थाने मराठी भाषेला राजमुकुट प्राप्त झाला आहे. .यापुढे ही भाषा साहित्यातून समृद्ध करणे , मराठी भाषा संस्कृती ही समाजात आणखी वृद्धिंगत करणे ही आपली जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले .
या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी ,शिल्पा रसाळ कवी चंद्रकांत पालवे, श्रीमती आशाताई मिस्कीन, पोपट धामणे ,अरविंद ब्राह्मणे, बेबीताई गायकवाड ,ज्ञानदेव पांडुळे ,शिवाजी साबळे यांनी आपल्या मौलिक मनोगतातून अभिजात मराठी दर्जा प्राप्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला .
यावेळी सावेडी वाचनालयात प्रसिद्ध मराठी साहित्यिकांच्या पुस्तकांचे पूजन करण्यात आले यावेळी लीळाचरित्र ज्ञानेश्वरी पासून ते आजपर्यंतच्या लेखकांच्या पुस्तकांचा समावेश होता.
याप्रसंगी उपस्थित साहित्यिक यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंदात या निर्णयाचे स्वागत असा आनंद उत्सव प्रत्येक शाळेत महाविद्यालयात व प्रत्येक मराठी माणसाने साजरा केला पाहिजे खऱ्या अर्थाने ही दिवाळी पूर्वीची दिवाळी पाटली पाहिजे असे आवहान यावेळी किशोर मरकड यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका व साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या माजी उपाध्यक्ष व वाचनालयाच्या ज्येष्ठ विश्वस्त साहित्यिक प्रा.मेधाताई काळे यांनी आजारी असल्याने फोनवरून आपल्या शुभेच्छा व शासनाचे अभिनंदन व आभार यावेळी मानले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिल्पा रसाळ तर आभार ग्रंथपाल प्रा.दशरथ खोसे यांनी मांडले. यावेळी सावेडी वाचनालयाच्या सौ सारिका देव ,पौर्णिमा गायकवाड , संकेत फाटक, साक्षी पद्मा, दिपाली कल्याणम यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.