Ahmednagar Vij: विविध योजनांच्या माध्यमातून सभासदांबरोबर त्यांच्या कुटूंबियांचीही काळजी घेत आहे – आ.संग्राम जगताप

 अहमदनगर वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Ahmednagar Vij: विविध योजनांच्या माध्यमातून सभासदांबरोबर त्यांच्या कुटूंबियांचीही काळजी घेत आहे - आ.संग्राम जगताप




     अहमदनगर (प्रतिनिधी)– कोणतीही संस्था ही त्या संस्थेतील चांगल्या संचालक मंडळाच्या कारभाराने प्रगती पथावर राहत असते. अहमदनगर वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था गेल्या तीस वर्षांपासून सभासदाच्या उन्नत्तीसाठी काम करत आहे. सभासद, कर्जदार, ठेवीदारांच्या सहकार्याने पतसंस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. सभासदांची आर्थिक उन्नत्ती साधण्याबरोबरच त्यांचा अपघात विमा, वैयक्तिक विमा, गुणवंत पाल्यांचा सन्मान, कन्यादान योजना, स्त्री जन्माचे स्वागत, आहेर योजना, सेवानिवृत्ती योजना अशा योजनांच्या माध्यमातून सभासदांबरोबर त्यांच्या कुटूंबियांचीही काळजी घेण्यात येत आहे. पतसंस्थेचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असून, सभासदांच्या भवितव्यासाठी सुरु असलेल्या उपक्रमास आपले नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.



     अहमदनगर वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थापक शिरिष गायकवाड, अशोक पाथरकर, इब्राहिम हवालदार, रघुनाथ लाड, दतू भोईर, माऊली बडधे, सतीश लोहगांवकर, चंद्रकांत सुरवसे, संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष सतीश भुजबळ, शंकर जारकड, चेअरमन संतोष शेलार, व्हाईस चेअरमन आशिष वेळापुरे, सचिव रुपेश चाकणे आदि मान्यवर उपस्थित होते.


     यावेळी सतीश भुजबळ म्हणाले, स्वाभिमानी तांत्रिक पॅनेलच्या माध्यमातून गेल्यावेळी या पतसंस्थेत सत्तांतर झाले. त्यानंतर पतसंस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने गेल्या दोन वर्षांपासून पतसंस्थेने पारदर्शक कारभार करुन  ऑडिट वर्ग ‘अ’ मिळविला आहे. सभासदांचे हित जोपासण्याचे काम संचालक मंडळाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे भविष्यात ही संस्था आणखी प्रगती करेल, असा विश्‍वास व्यक्त केला.



     यावेळी चेअरमन संतोष शेलार म्हणाले, ज्या संचालक मंडळांनी तीस वर्षांपूर्वी सहकार क्षेत्रात पतसंस्थेचे जे रोपटे लावले त्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. स्वाभिमानी तांत्रिक पॅनल सत्तेवर आल्यापासून संस्थेचा कारभार हाती घेतल्यापासून सभासदांना जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी विविध योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे. काटसरीचे संस्थेचे कारभार संचालक मंडळाच्या सहकार्याने सुरु असून, सभासदांच्या उन्नत्तीसाठी जास्तीत जास्त उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे सांगितले.



     यावेळी व्हाईस चेअरमन आशिष वेळापुरे म्हणाले, सर्व संचालक मंडळाच्या विचार विनिमय करुन सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. गेल्या वर्षी काही वर्षात पतसंस्था प्रगतीपथावर आहे. यंदाच्या वर्षी सभासदांच्या मागणीनुसार सेवानिवृत्ती योजन व  इतर विविध योजना राबवत असलेल्या मानधन रकमेत दुपटीपेक्षा जास्त प्रोत्साहन म्हणून देण्यात येण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गुणवंत पाल्यांच्या शालेय बक्षिस योजनेही सुरु करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.



     याप्रसंगी सचिव रुपेश चाकणे यांनी संस्थेच्या वार्षिक अहवाल सादर करुन.  पतसंस्थेच्या माध्यमातून प्रगतीचा आढावा सादर केला.  सभेच्या विषयी पत्रिकेतील सर्व विषयांना उपस्थित सभासदांना बोलण्याची संधी देण्यात आली व म्हणणे ऐकून घेत शंकाचे निरसन करण्यात आले.  यावेळी निसर्ग संवर्धनासाठी सर्व सभासदांना वृक्ष वाटप करण्यात आले.



     यावेळी तज्ञ संचालक प्रवीण जठार,  संचालक बाळासाहेब जावळे, संतोष भिंगारदिवे, सचिन चोरगे, किशोर काळे, कुशाबा वायसे, अरुण भोसले, सचिन सुडके, अरविंद पाठक, प्रवीण देशमुख, सोमनाथ क्षीरसागर, अशोक मते, श्रीमती सुनिता मेढे, श्रीमती उषा मिसाळ, व्यवस्थापक दिलीप घोडेचोर, बळीराम गायकवाड, दीपक हुशारे आदींनी सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.