Anand Rishiji: आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन हे भाग्यच : मंत्री धनंजय मुंडे

  Anand Rishiji:  आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन हे भाग्यच – मंत्री धनंजय मुंडे

Anand Rishiji:  आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन हे भाग्यच - मंत्री धनंजय मुंडे


      Anand Rishiji: अहमदनगर (प्रतिनिधी):  आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांनी अतिशय खडतर तप करुन आत्मकल्याणाचा मार्ग शोधला आहे. आचार्यंश्रीचे विचार प्रत्येकाला नवी ऊर्जा देत आहेत. मनुष्य जीवन उपभोग घेण्यासाठी नसून त्यागासाठी आहे, त्यामुळे मनुष्य जीवन खर्‍या अर्थाने सार्थकी लागते, असे मौलिक विचार त्यांनी समाजाला दिले आहे. 


नगर ही संतांची भुमी आहे. जैन धर्मिय संत आनंदऋषीजी म.सा. यांनी जैन धर्मातील ‘जिओ और जिने दो’ संदेश सर्व देशभर पोहचविला. सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले, असे प्रतिपादन कृषीमंत्री ना.धनंजय मुंढे यांनी केले.


     कृषी मंत्री ना.धनंजय मुंढे यांनी आज सकाळी शब्दगंध साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी नगरमध्ये आले असता त्यांनी आनंदधाम येथील आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या समाधी स्थळास भेट देऊन दर्शन घेतले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज व आदर्शऋषीजी महाराज यांनी मंत्री धनंजय मुंढे यांना शुभाशिष दिले. 


यावेळी नगरसेवक विपुल शेटीया,  मर्चंटस् बँकेचे माजी चेअरमन अण्णासाहेब मुनोत, निखिल वारे, नितीन शिंगवी, धिरज सुराणा, प्रशांत मुथा, संतोष ढाकणे, डॉ.आशिष भंडारी, सुहास शिरसाठ, राहुल सोनी मंडलेचा, संतोष गांधी, उमेश बोरा, आनंद चोपडा, सचिन फिरोदिया, निलेश जांगडा, नितिन कटारिया, अभय लुणिया, आदिंसह नागरिक उपस्थित होते.


     यावेळी विपुल शेटीया यांनी आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या कार्याची माहिती दिली.