अरणगावमध्ये सर्व धर्म समभाव मित्र मंडळ यांचा अनोखा उपक्रम
अहमदनगर । दर्शक :
अरणगाव मध्ये गणेश उत्सव निमित्त सर्वधर्मसमभाव मित्र मंडळ यांचा अनोखा उपक्रम राबविला असून दौड रोडवरील बाह्य वळण रेस्टवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात चेअरमन गोरख शिंदे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप केले त्याचा लाभ अनेक प्रवाश्यानी घेतला व या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी आयोजक दिलीप कांबळे,अनिल भिंगारदिवे,राहुल मायाशेठ कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे,गणपत शिंदे, गौतम जाधव,संतोष भिंगारदिवे, साहिल गायकवाड, किरण कांबळे,ऋतिक कांबळे,सुमित माळवे,आदेश कांबळे,ऋषिकेश कांबळे,भैय्या कांबळे,सुरज भांबळ,विशाल कैलास कांबळे,गणेश गुंड,प्रतीक आंग्रे,सागर माळवे,प्रेम कांबळे,आकाश साळवे,अभी खाकाळ,राजू खंडागळे,मंगेश भिंगारदिवे,सागर भांबळ,अंबादास गायकवाड,अश्विन कांबळे,पियुष कांबळे,संदेश देठे,आदेश देठे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व धर्म समभाव मित्र मंडळ हे ग्रामपंचायत सदस्या नम्रता कांबळे यांच्या मार्गदर्शखाली वर्षभर विविध उपक्रम राबवित असते,मिरवणूक काढून त्यावर खर्च करण्यापेक्षा स्थनिक लोकांना व प्रवासी मंडळींना प्रसाद वाटावा असे ठरले व त्याप्रमाणे आज प्रसाद वाटप करण्यात आले.
सर्व धर्मातील व्यक्तींनी आनंदाने या कार्यक्रमांत सहभागी झाले असे राहुल कांबळे यांनी सांगितले व येणाऱ्या काळातही खूप सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच विविध सामाजिक उपक्रम सर्व युवकांसाठी व युवतींसाठी मोठ्या प्रमाणात भरविण्यात येणार आहेत असे मायाशेठ कांबळे यांनी सांगितले.