Ashokbhau Firodia School | अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये रंगली वाद-विवाद स्पर्धा
- प्रथम – प्रणाली बाबासाहेब कडूस (श्री रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल),
- द्वितीय- अक्षरा गणेश फुलसौंदर (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल),
- तृतीय- अथर्व अर्जुन पालवे (श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल)
- माहिनूर आदिल शेख (पी.ए. इनामदार स्कूल) आणि
- शिवांशु श्रीपाद वखारे (सेंट विवेकानंद हायस्कूल) उत्तेजनार्थ
अहमदनगर । दर्शक :
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये हिंदी दिनानिमित्त वाद-विवाद स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत 16 विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेचा सांघिक करंडक श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूलने पटकाविला.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या स्मरणार्थ हिंदी दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अशोकभाऊ फिरोदिया शाळेच्या सभागृहात प्रारंभी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा परीक्षक आजेमा शेख व प्रमुख पाहुण्या अंजली बोधक उपस्थित होत्या. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शर्मा, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख कांचन कुमार उपस्थित होत्या. शालेय शिक्षिका सुवर्णा मलमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनीनी समूहगीताने पाहुण्यांचे स्वागत केले.
आजेमा शेख म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना प्रत्येक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हिंदी ही राष्ट्र भाषा असून, ती सर्वांना परिचित असली पाहिजे. स्पर्धेत नम्रता असणारे विद्यार्थी पुढे जातात. वादळामध्ये मोठे डोंगर आणि गवत देखील खाली वाकून नम्र होतात. त्याचप्रमाणे जीवनात नम्रतापूर्वक वागण्याचे त्यांनी आवाहन केले.
अंजली बोधक म्हणाल्या की, स्पर्धकांनी विषयानुरूप आपली मते व्यक्त करावी. वक्तृत्व कौशल्याने मत व्यक्त करुन त्याला विविध उदाहरणाची जोड द्यावी. विद्यार्थ्यांच्या स्पर्धेतून देखील खुप काही शिकण्यासारखे असल्याचे सांगून, त्यांनी दरवर्षी नियोजनबध्दपणे घेण्यात येणाऱ्या स्पर्धेचे कौतुक केले.
स्पर्धेसाठी वृद्धाश्रम होणे चाहिए या नही! हा विषय देण्यात आला होता. या विषयावर विद्यार्थ्यांनी वृध्दाश्रमाबद्दल आपली मते मांडली. स्पर्धा संपल्यावर निकाल जाहीर करुन बक्षिस वितरण करण्यात आले.
यामध्ये प्रथम– प्रणाली बाबासाहेब कडूस (श्री रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल), द्वितीय- अक्षरा गणेश फुलसौंदर (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल), तृतीय- अथर्व अर्जुन पालवे (श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल),
उत्तेजनार्थ– माहिनूर आदिल शेख (पी.ए. इनामदार स्कूल), शिवांशु श्रीपाद वखारे (सेंट विवेकानंद हायस्कूल) यांनी बक्षिसे पटकावली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.
संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सह कार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. आसिफ शेख यांनी निकाल जाहीर केला. स्पर्धेचे सूत्रसंचालन भारती हिंगे यांनी केले. आभार संगीता वंगा यांनी मानले.