मंगलारम यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार कृतिशील व्यक्तींना दिला गेला हे कौतुकास्पद : डॉ सुधीर तांबे

सेवाव्रती स्व.विठ्ठलराव नारायण मंगलारम सर स्मृती जीवनगौरव पुरस्कार २०२३ चे वितरण उत्साहात संपन्न    अहमदनगर (प्रतिनिधी)  – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मगाव असणाऱ्या ‘जोर्वे’ गावात मंगलारम सर मुख्याध्यापक म्हणून आले, आपल्या कामाचा ठसा त्यानी त्या ठिकाणी उमटवला. ज्यांनी सतरा वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात विविध महत्वाच्या खात्यांचा कारभार यशस्वीपणे सांभाळला असे मा मंत्री बाळासाहेब थोरात हे … Read more

Ahmednagar Sports: खेळांच्या माध्यमातून युवक भक्कम स्थान निर्माण करु शकतो – आ.संग्राम जगताप

 Ahmednagar Sports: महापद्मसेना आयोजित ‘अखंड पद्मशाली चषक 2023’ चे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ Ahmednagar Sports: अहमदनगर (प्रतिनिधी)  –   समाजमध्ये महापद्मसेना मोठ्या उत्साहने काम करत आहे. समाजातील तरुण युवकांना नोकरी बरोबरच मैदानी खेळाकडे वळावे म्हणुन भव्य टेनिस बॉल क्रीकेट स्पर्धा भरवुन एक चांगली कामगिरी केली आहे. आज स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी मिळणे फार कठीण झाले आहे.  खेळांच्या माध्यमातून तो … Read more

राजेंद्र साळवे यांना ‘समाज भुषण’ पुरस्कार प्रदान

 फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्यावतीने महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन      अहमदनगर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील कडुस येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या वतीने महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.  यामध्ये नगरमधील भारतीय बौद्ध महासभेचे दक्षिण महासचिव  तसेच सम्यक संकल्प फाऊंडेशनचे सेक्रेटरी  व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे  शाखाधिकारी राजेंद्र … Read more

Ahmednagar News: यशवंतराव होळकर यांच्या पुतळ्याच्या स्वागताने इतिहासाला उजाळा- आ.संग्राम जगताप

  Ahmednagar News: ऐतिहासिक अहमदनगर शहरात शौर्य यात्रेचे भव्य स्वागत      Ahmednagar News: अहमदनगर (प्रतिनिधी)  – इंग्रजांना वेगवेगळ्या युद्धात तब्बल 18 वेळा पराभुत करणारे शूर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्ययात्रेचे पुणे ते इंदौर आयोजित करण्यात आले असून, ही शोर्य यात्रा अहमदनगरला आली असता, भव्य स्वागत करण्यात आले.      अहमदनगर बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा

 अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा   अहमदनगर : आरोपी नामे निलेश राजु झेंडे , वय -२२ वर्षे , रा.गेवराई रोड , शेवगाव जि . अहमदनगर याने पिडीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . पी.आर. देशमुख साहेब , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश … Read more

श्रीरामपूर शहर भाजपचा उपक्रम सर्वांना दिशादर्शक : मंत्री विखे

  दीडशे कोरोना एकल महिलांना शिलाई मशिन प्रदान श्रीरामपूर (प्रतिनिधी) :  भारतीय जनता पक्षाच्या श्रीरामपूर शहर मंडळाच्यावतीने  तालुक्यातील गरजू, गरीब, होतकरु अशा दीडशे कोरोना एकल महिलांना शिलाई मशिनचे वाटप महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महिला मेळाव्यात करण्यात आले. श्रीरामपूर शहर भाजपचा हा उपक्रम सर्वांसह देशाला दिशादर्शक ठरेल, असे प्रशंसोद्गार मंत्री विखे याप्रसंगी काढले. … Read more

मुलांच्या आधार नोंदणी दुरुस्तीला मुदतवाढ, नेटवर्कमधील अडथळ्यांचा व्यत्यय:सुनिल गाडगे

शिक्षकांची जुलैपर्यंत टळली अतिरिक्त ठरण्याची भीती; शाळांना 15 जून पर्यंत सुट्टी  मुलांच्या आधार नोंदणी दुरुस्तीला मुदतवाढ,नेटवर्क मधील अडथळ्यांचा व्यत्यय- सुनिल गाडगे अहमदनगर – राज्यातील शाळांनी अद्याप साडेतीन लाख विद्यार्थ्यांची आधार माहिती स्टुडंट्स (विद्यार्थी प्रणाली) पोर्टलवर नोंदवलेली नाही. त्यामुळे ते विद्यार्थी बोगस असल्याचे गृहीत धरून संच मान्यतेत जवळपास १३ हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तवली जात … Read more

रेल्वे सल्लागार समितीवर अशोकराव कानडे यांची फेरनिवड

रेल्वे सल्लागार समितीवर अशोकराव कानडे यांची फेरनिवड    अहमदनगर – अहमदनगर रेल्वे स्थानकाच्या सल्लागारपदी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे सचिव व शहर सहकारी बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अशोकराव कानडे यांची फेर निवड करण्यात आली. सोलापूर विभागीय सहाय्यक वाणिज्य प्रबंधक कल्पना बनसोडे यांनीही नियुक्ती केल्याचे पत्र दिले.      श्री.कानडे हे गेली … Read more

चांगल्या विचारांच्या लोकांमुळे समाज पुढे जात आहे -प्रा. माणिक विधाते

मर्चंट बँकेचे संचालक चोपडा व लॉयर्स सोसायटीचे व्हाईस चेअरमन जहागीरदार यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी) – चांगल्या विचारांच्या लोकांमुळे समाज पुढे जात आहे. राजकारण फक्त निवडणुकांपुरते मर्यादीत ठेऊन सामाजिक कार्याने चांगले माणसे जोडून विकासात्मक योगदान देण्याची गरज आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असावेत, मात्र वैर असता कामा नये. समाजाला दिशा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. जीवन … Read more

शिर्डी मधील सहा हाॅटेल्सवर श्रीरामपूर पाेलिसांचा छापा, १५ मुलींची सुटका, ११ जण ताब्यात

 शिर्डी मधील सहा हाॅटेल्सवर श्रीरामपूर पाेलिसांचा छापा, १५ मुलींची सुटका, ११ जण ताब्यात शिर्डी। अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील ६ हॉटेलवर छापा टाकून अनैतिक अवैध व्यवसाय करणाऱ्या प्रतिष्ठित लोकांच्या मालकीच्या हॉटेलवर श्रीरामपूर पाेलिसांनी छापा टाकत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.या घटनेमुळे शिडीत मोठी खळबळ उडाली आहे. श्रीरामपूरचे विभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त … Read more