वृक्षांचे महत्त्व आणि मोबाईल येण्याआधीचे खेळ आणि आत्ताचे खेळ यातील फरक या देखावाच्या माध्यमातून सादर
अहमदनगर । दर्शक :
आजच्या वातावरणाची जी अवस्था झालेली आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात येते की वृक्ष किती महत्त्वाचे आहे आणि वृक्ष आणि मानव यांच्या अनेक निगडित बाबी आहेत. वृक्षांची संख्या कमी झाल्याने निसर्गाचे चक्र हे बदलत चालले आहे तसेच मानवाला अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वृक्षारोपण करू त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. बाहेरचे खेळ बंद झाल्यानं अगदी लहान मुलंही तासनतास मोबाईलवर खेळू लागले. कार्टून्स, गेम्स, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म्स अशा मनोरंजनाच्या नवीन साधनांची मुलांना सवय लागली. मोबाईल येण्यापूर्वी लहान मुलं अतिशय सुदृढ असायची ते आजारीही जास्त होत नव्हते. पण आता या मोबाईलच्या अति आहारामुळे अनेक तरुण-तरुणी लहान मुले लहान वयातच वेगवेगळ्या निर्णय घेऊन आपले जीवन संपत आहे पूर्वी गल्लोगल्लीत लहान मुलांचा खेळण्याचा एक कल्ला वेगळाच असायचा पण आत्ताच्या गल्ल्यांमध्ये आणि आपल्या परिसरामध्ये तो खेळांचा कल्ला आता आपल्याला ऐकू येत नाही. ही सर्व व्यथा या देखाव्याच्या माध्यमातून श्रीकांत आडेप यांनी सादर केलेली आहे.
दातरंगे मळ्यातील एकदंत कॉलनीतील रहिवासी श्रीकांत आडेप यांनी गेल्या अनेक वर्षापासून घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारा देखावा ते सादर करतात. यावर्षी वृक्षांचे महत्त्व आणि मोबाईल येण्याआधी चे खेळ आणि आत्ताचे खेळ हा देखावा आणि एक हाजर पाचशे पत्रवळ्यांनी आकर्षक पर्यावरण पूरक आरास केली आहे.
या देखावा मध्ये सहा फुटी वृक्ष हे कागदाच्या रद्दी सहाय्याने अतिशय सुंदर आकर्षक बनवून त्यावरती वृक्षांमुळे होणारे फायदे आणि तोट देणारे संदेश फलक लावण्यात आले. त्यात प्रमुख्याने मला वाचवाल तरच तुम्ही वाचाल… असा संदेश या झाडाकडून दिला जातोय असे दाखवण्यात आले. तसेच पूर्वीच्या गल्लोगल्ली जे खेळ खेळायचे त्याचे सर्व छायाचित्र आणि आत्ता मोबाईल मुळे होणारे मुलांचे नुकसान याबाबतीत संदेश देणारे फलक लावून अतिशय सुंदर असा हा देखावा सादर केला त्यातून लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावे, मोबाईलचा योग्यच वापर व्हावा, यासाठी अनेक संदेश देण्यात आले.
मागच्या वर्षी यांनी शिर्डी साईबाबा देखावा सादर केला होता. कोरोनाच्या महामारी मध्ये अनेकांनी लस घेतली नव्हती अशांना जागृत करण्यासाठी त्यांनी घरगुती देखाव्याच्या माध्यमातून लसीचे महत्त्व हा देखावा सादर केला होता. दरवर्षी त्यांना देखाव्यासाठी मुलगी सृष्टी आडेप आणि सौ.सपना आडेप, बहिण पल्लवी पेडंम, मित्र अमोल गाजेंगी,अर्पिता सुंकी,श्रावणी बिटला, सार्थक बेत्ती यांचे विशेष सहकार्य लाभते.
श्री एकदंत कॉलनीमध्ये आणि परिसरामध्ये या देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे दरवर्षी वेगवेगळ्या देखावा सादर केल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे.