Dhangar Samaj Ahmednagar: धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात लावून धरणार -आ.संग्राम जगताप

Dhangar Samaj Ahmednagar: धनगर समाज सेवा संघाच्या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यात प्रतिपादन


Dhangar Samaj Ahmednagar: धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात लावून धरणार -आ.संग्राम जगताप



     अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाल एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी समाजाने मोठा लढा उभा केला आहे. राज्यभर विविध संघटना, संस्था त्यासाठी उपोषण, आंदोलने, मोर्चे काढत आहेत. या सर्वांचा केंद्रबिंदू हा नगर जिल्हा आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही सरकारची भुमिका राहिली आहे. 


कायदेशीर बाजू तपासून धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही सर्वांचीच इच्छा आहे. याबाबत आपणही येणार्‍या अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय लावून धरुन, सरकारच्या कार्यकाळातच धनगर आरक्षणाचाही प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची ग्वाही आमदार संग्राम जगताप यांनी दिली.


     धनगर समाज सेवा संघाच्यावतीने अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरातील गंगा लॉन येथे आयोजित राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याच्या समारोपप्रसंगी आ.संग्राम जगताप बोलत होते. 


 संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड, व्याख्याते किसन आटोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक संपत बारस्कर, नगरसेवक निखिल वारे, संघाचे मार्गदर्शक निशांत दातीर, विठ्ठलराव वाडगे, दत्तात्रय गावडे, अशोक राशीनकर, काका शेळके, ए.वाय.नरोटे, अनिल ढवण, डॉ. अशोक भोजने, गोवर्धन सरोदे, ज्ञानदेव घोडके, प्रा. शरद धलपे, रोहन ढवण, प्रथमेश तागड आदी उपस्थित होते.


      संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड म्हणाले गेल्या आठ वर्षांपासून आम्ही धनगर समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन करत असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मेळाव्यानिमित्त धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्नांवरही आवाज उठविला जात असल्याचे सांगितले.


      मेळावा यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत तागड, सोपानराव राहिंज, वसंतराव दातीर, विनायक नजन, दशरथ लांडगे, विजय शिपणकर, सुभाष जाडकर आदींनी परिश्रम घेतले.