खासदार डॉ विखे पाटील हेच पारनेर तालुका दहशतमुक्त करु शकतील : आमदार प्रशांत ठाकूर
मुंबई। – खासदार डॉ विखे पाटील हेच पारनेर तालुका दहशतमुक्त करु शकतील. गेली साडेचार वर्ष आम्ही फार भोगले आहे. माजी आमदाराने या ठिकाणी येऊन आम्हाला धमक्या दिल्या आहेत. आमदार करण्यासाठी मुंबईकरांनी जे योगदान दिले त्याचा विसर पडला आहे.
खासदार विखे पाटील हेच या गुंडागर्दीला आळा घालू शकतील असे सक्षम नेतृत्व खासदार पुन्हा विक्रमी मताधिक्याने खासदार होतील यासाठी मुंबई पासून ते जिल्ह्यापर्यंतचे सर्व जनता एकमुखाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची खात्री कामोठे परिसरातील मान्यवरांनी दिली.
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पारनेरकर, विजुभाऊ औटी मित्र परिवार व कोमोठे सांस्कृतिक युवा मंडळ आणि संदीप पाटील जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे दि. ७ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामोठेकरांनी आपले मत मांडले.
गुंडागर्दी थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार: खा. सुजय विखे पाटील
खासदार विखे पाटील यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपद होणार असून गेली दहा वर्षात सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले असून भाजपने मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. पारनेर तालुक्यात कशाप्रकारे गुंडागर्दी सुरू आहे हे सत्य समोर आहे. विकासाच्या नावाखाली काय सुरू आहे हे लोकांच्या लक्षात उशीरा आले आहे.
आज जर लोकप्रतिनिधींना जर गोळ्या घालण्याच्या धमक्या देण्याचे काम होत असेल तर सर्वसामान्य जनता किती असुरक्षित आहे याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. पारनेर तालुक्यात गेली साडेचार वर्षात जी गुंडागर्दी सुरू आहे ती थांबवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून तालुक्यातील जनतेलाही आधारवड राहील अशीच भुमिका सातत्याने घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.