Dr Vikhe Agri College: पंचमहाभुतांचा शेतीसाठी उपयोग करावा : डॉ.दत्तात्रय वने

 Dr Vikhe Agri College: डॉ.विखे पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी केले शेतकर्‍यांना मार्गदर्शन


Dr Vikhe Agri College: पंचमहाभुतांचा शेतीसाठी उपयोग करावा : डॉ.दत्तात्रय वने


 Dr Vikhe Agri College: जमिन, पाणी, वीज, वायु, आकाश या पंचमहाभुतांचा शेतीसाठी उपयोग करावा : डॉ.दत्तात्रय वने

      Dr Vikhe Agri College: अहमदनगर (प्रतिनिधी): शेतकर्‍यांनी आपल्याकडील उपलब्ध असणार्‍या साधन सामुग्रीचा वापर करुन शाश्वत शेतीची कास धरावी. जमिन, पाणी, वीज, वायु, आकाश या पंचमहाभुतांचा उपयोग शेतीसाठी केला गेला पाहिजे. काळानुरुप बदलणार्‍या वातावरणाचा आणि आधुनिकतेची समन्वय साधून शेती केल्यास नक्कीच ती फायद्याची ठरु शकते. शासन, कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालांच्यावतीने शेतकर्‍यांना नेहमीच मार्गदर्शन केले जाते. अनेक नवनवीन मोबाईल अ‍ॅपद्वारेही आपणास मार्गदर्शन मिळू शकते, असे प्रतिपादन व्याख्याते डॉ.दत्तात्रय वने यांनी केले.

     विळद घाट येथील डॉ.विखे पाटील कृषि महाविद्यालयातर्फे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत देहरे गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्याख्याते डॉ.दत्तात्रय वने, प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे, सरपंच सौ.नंदा काळे, उपसरपंच दिपक जाधव, कृषि पर्यवेक्षक विजय सोमवंशी, सहाय्यक सौ.कविता मदने, संजय शिंदे, ग्रा.पं.सदस्य महेश काळे, सोसायटीचे चेअरमन अर्जुन काळे, प्रगतीशिल शेतकरी वैभव काळे, नाना लांडगे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी प्राचार्य एम.बी.धोंडे म्हणाले, शेतकर्‍यांना माती परिक्षण पासून बाजारपेठेपर्यंत आज विविध स्तरातून मार्गदर्शन मिळत आहे, याचा लाभ घेत शेती केली पाहिजे. त्याचबरोबर शेतीपुरक व्यवसायानेही हातभार लागू शकतो. एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकर्‍यांचे उत्पनही वाढेल. डॉ.विखे पाटील कृषी महाविद्यालय आपणास मार्गदर्शन करण्यास तयार असल्याचे सांगितले.

     यावेळी श्री.विजय सोमवंशी म्हणाले, कृषि विभागामार्फत शेतकर्‍यांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जातात, त्याचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे. त्यासाठी सर्वोतोपरि सहकार्य केले जाईल, असे सांगितले. यावेळी प्रा.एच. एल. शिरसाठ यांनी सेंद्रीय शेतीबद्दल उपस्थितांना अद्यावत माहिती दिली. प्रा.सौ.जयश्री राऊत यांनी मधुमक्षिका पालन चे फायदे सांगितले.

     याप्रसंगी संजय शिंदे यांनी विखे पाटील कृषि महाविद्यालयाच्यावतीने आमच्या गावात कृषिकन्यांनी शेतकर्‍यांना चांगले सहकार्य करुन मार्गदर्शन केले त्याचा शेतकर्‍यांना चांगला फायदा होईल. अशा उपक्रमांमुळे शेतकर्‍यांमध्ये समाधान निर्माण झाल्याचे सांगितले.

     कार्यक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा.किरण दांगडे, प्रा.बी.व्ही.गायकवाड, प्रा.पुनम ठोंबरे, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कु.मैथिली सुर्यवंशी हीने केले तर आभार शुभदा मोहिते हीने मानले.