Drawing Competition: राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेला 8 हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती : साईराज ठरला सर्वांचे आकर्षण
Drawing Competition: अहमदनगर (प्रतिनिधी): शहर विकासात भौतिक सुविधांबरोबर कला-क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हेही महत्वाचे आहे. विकास कामे करतांना कला-क्रीडा क्षेत्रही विकसित होणे गरजेचे असते, त्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ मिळूवन दिल्यास आपल्या शहराचे नाव राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचते. आज निखिल वारे यांनी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून कलाकारांच्या कला-गुणांना वाव देण्याबरोबरच एक व्यासपीठ मिळवून दिले आहे, असे प्रतिपादन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
सावेडी उपनगरात गंगा लॉन्स येथे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ.संग्राम जगताप, उद्योजक सचिन आबा कोतकर,उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार, नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, अविनाश घुले, योगीराज गाडे, पल्लवीताई जाधव, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, उदय कराळे, अनिल ढवण, तुषार पोटे, महेश तवले, कैलास गर्जे, राजू बुधवंत, अमोल लगड, आरिफ शेख आदि उपस्थित होते. यावेळी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्याचा छोटा उस्ताद साईराज केंद्रे हा सर्वांचा आकर्षण ठरला.
खा.डॉ.सुजय विखे पुढे म्हणाले, निखिल वारे यांनी आपल्या प्रभागातील विकास कामांमधून कर्तृत्व सिद्ध करुन दाखविले. हे करतानाच समाजातील प्रत्येक घटकांसाठी उपक्रम राबविले. आजच्या राज्यस्तरीय स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाल. भविष्यात कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांसाठी आपले सर्वोतोपरि सहकार्य राहील, असे सांगितले.
याप्रसंगी आ.संग्राम जगताप यांनी आजच्या स्पर्धेला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थितीबद्दल व साईराज केंद्रे याने साधलेला संवाद यामुळे मी भा गेलो. सावेडीमधील नागरिकांच्या मुलभूत प्रश्न सोडविण्याबरोबरच विविध उपक्रमांच्या माध्यमातून निखिल वारे हे संपर्कात असतात. विकास कामांबरोबरच कलाकार, खेळाडू यांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले आहे. राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेतून जिल्ह्यातील विद्यार्थी व कलाकारांना राज्यस्तरावर पोहचविण्याची संधी मिळाली, असे सांगितले.
या स्पर्धेसाठी 8 ते 10 हजार विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांना खाऊचे वाटप करण्यात आले. स्पर्धकांची संख्या वाढल्याने निकाल लगेच जाहीर न करता लवकरच या स्पर्धेचे परिक्षक प्रा.अनिल काळे, प्रा.कविगज बोटे, प्रा.वृषाल एकबोटे, प्रा.विवेक भारताल हे परिक्षण करून लवकर निकाल जाहीर करतील. या कार्यक्रमासाठी जगदंब युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, आंधळे कोचिंग क्लासच्या वतीने योग्य नियोजन केले, या सर्वांचे निखिल वारे यांनी आभार मानले.