Maratha Samaj Thane: आम्ही गनिमी काव्याने आंदोलन करणार ; ठाण्यातला मराठा समाज आक्रमक

Maratha Samaj Thane: आम्ही गनिमी काव्याने आंदोलन करणार ; ठाण्यातला मराठा समाज आक्रमक 

Maratha Samaj Thane: आम्ही गनिमी काव्याने आंदोलन करणार ; ठाण्यातला मराठा समाज आक्रमक



Maratha Samaj Thane:  ठाणे : ठाण्यातला मराठा समाज हा आक्रमक झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण मराठा आरक्षणासाठी कटीबद्ध आहोत असं म्हटलेलं असतानाच आता त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू शकत नाही असं मराठा समाजाचं म्हणणं आहे. 

ठाण्यातला मराठा समाज एकवटला आहे. गनिमी काव्याने आम्ही आंदोलन करणार आहोत. मराठा समाजाची भूमिका आता एकत्र येऊन आंदोलन करणार आहोत असा इशाराच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश आंब्रे यांनी दिला आहे.


मराठा क्रांती मोर्चाची ही बैठक पार पडल्यानंतर पदाधिकारी मंगेश आवळे म्हणाले, “महाराष्ट्राला मराठा मुख्यमंत्री लाभणं ही लाजिरवाणी बाब आहे. मराठ्यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला ही आमची पहिली चूक आहे. जे राज्यकर्ते आहेत ते सामान्य मराठे नाहीत ते पिढीजात राज्यकर्तेच आहेत. त्यामुळे त्यांची आम्हाला लाज वाटते. 


आजचे मुख्यमंत्री हे जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा ते मराठा भवन किंवा एक हॉस्टेलही दिलं नाही. आता मुख्यमंत्री काय आम्हाला आरक्षण देणार? मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना जो समाजाला शब्द दिला आहे तो पाळला जाणारच नाही.


 ठाण्यातले मुख्यमंत्री आहेत त्यांना ठाण्यातल्या मराठ्यांच्या समस्या सोडवण्यात आल्या नाहीत ते महाराष्ट्रातल्या आरक्षण देणार? मराठा आरक्षण मुख्यमंत्री देऊ शकतात. मात्र ते मोदींच्या रिमोटने चालतात” असाही आरोप यांनी केला.


तसंच आम्ही आता एकत्र आलो आहोत. लवकरात लवकर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.आरक्षणासाठी आता आमचा गनिमी कावा असणार आहे असंही मराठा बांधवांनी म्हटलं आहे. आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही आक्रमकपणे आंदोलन करणार आहोत. आता आम्हाला टिकणारं आरक्षण हवं आहे. 


मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. आता सरकारने पळवाटा काढू नये असंही या मराठा बांधवांनी म्हटलं आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत आम्हाला आरक्षण का दिलं नाही? त्यावेळेस नेमकी काय अडचण होती? मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या रिमोटवर चालत आहेत. 

मराठा मुलं मरत आहेत, त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय केलं? असाही प्रश्न मराठा बांधवांनी विचारलं आहे. तसंच आता आम्ही शांत बसणार नाही असाही इशाराही मराठा बांधवांनी दिला आहे.