महापद्मसेनेच्या वतीने स्वातंत्र दिनानिमित्त निराधार विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन हा विविध उपक्रमांनी साजारा केला जातो. निराधार कुटूंबातील विद्यार्थ्यांना या दिनी शैक्षणिक मदत देऊन हा दिवस साजरा करण्याच्या उद्देशाने महापद्मसेनेच्या वतीने ‘चला देऊ शैक्षणिक स्वातंत्र्य अभियान’ या उपक्रमात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
15 ऑगस्ट निमित्त महापद्मसेनेच्यावतीने श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालय येथे प्रतिवर्षी प्रमाणे काही निराधार विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी रवि दंडी, शंकर जिंदम, उदय सुरम, किरण वल्लाकट्टी, राजेंद्र इगे, अमित बिल्ला, अमोल येनगंदुल, आनंद येनगंदुल आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्याध्यापिका वाघमारे म्हणाल्या की, समाजातील निराधार कुंटूंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिल्याने त्यांचे शिकण्याच्या नकारात्मक विचारातुन सुटका होऊन खर्या अर्थांने निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळाल्याचा अनुभव येतो आणि ते अधिक ऊर्जेने शिक्षणात लक्ष देऊन स्वत:चे व देशाचे भविष्य उज्वल नक्कीच करतील, असे सांगुन महापद्मसेना ही संघटना गेली अनेक वर्षापासून हा उपक्रम सातत्याने आमच्या श्री मार्कंडेय विद्यालयातील निराधार विद्यार्थ्यांसाठी राबवित असतात आणि महापद्मसेना ही संघटना हे विद्यालयातील माजी विद्यार्थीच आहेत म्हणून अधिक आनंद होतो.
यावेळी प्रास्तविक रवि दंडी म्हणाले कि, समाजातील काही कुटूंबाची परिस्थिती बिकट असल्याने त्या निराधार कुटूंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळत नाही. असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून 15 ऑगस्ट रोजी महापद्मसेनेच्या ‘चल देऊ शैक्षणिक स्वातंत्र्य अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्या अभावी शिकण्याच्या पारतंत्र्यात असलेल्या निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन शिकण्याचे स्वातंत्र्य मिळवून द्यायचा संकल्प केला. तसेच यावेळी अनेक विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी महापद्मसेनेचे उदय सुरम म्हणाले कि, येत्या काही काळात ‘चला देऊ शैक्षणिक स्वातंत्र अभियाना’च्या माध्यमातून शहरातील विविध भागातील निराधार कुटूंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे
यावेळी महापद्मसेनेचे रवि दंडी, शंकर जिंदम, उदय सुरम, राजेंद्र इगे, विनोद बोगा, अमोल येनगंदुल, किरण वल्लाकट्टी, अमित बिल्ला, चंद्रकांत अल्ली, दिपक बुरला, गोविंदा नामन, प्रविण शिरापुरी, आनंद येनगंदूल, विनोद बुरा आदिंनी हा उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण वल्लाकटी यांनी केले. तर आभार उदय सुरम यांनी मानले.