Nayyar School: दुर्गादेवी अमरचंद नय्यर विद्या मंदिर व श्रीमान विशंभरदास अमरचंद नय्यर माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व परितोषिक वितरण संपन्न
Nayyar School: अहमदनगर (प्रतिनिधी) – आज विविध क्षेत्रात ग्लोबोलायझयन होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विविध आयपीएल, आयडॉल सारख्या स्पर्धांमधून चमकण्याची संधी मिळत आहेत. त्यासाठी शालेय स्नेहसंमेलन प्रथम व्यासपीठ ठरत आहेत. अभ्यासबरोबरच विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. त्यातूनही त्याचे भविष्य घडू शकते. संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थीही विविध स्पर्धा, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रात चांगली कामगिरी करुन संस्थेचे नाव उज्वल करत आहेत. विद्यार्थ्यांना सर्वोतोपरि सुविधा पुरवून त्यांचा सर्वांगिण विकास साधला जात आहे. आजच्या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृती या उत्कृष्ट व सर्वांना मंत्रमुग्ध करणार्या होत्या. त्याचबरोबर ‘उमलती कळी’ हस्तलिखितातून मांडलेले विचार विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची चुणूक दाखवत आहेत, असे प्रतिपादन बायजाबाई शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी केले.
बायजाबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या दुर्गादेवी अमरचंद नय्यर विद्या मंदिर व श्रीमान विशंभरदास अमरचंद नय्यर माध्यमिक विद्यालयाच्यावतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व परितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ‘उमलती कळी’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक विनित पाउलबुधे, उद्योजक महेंद्र सबलोक, संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब पवार, सचिव बापुराव आंधळे, दामोदर सातपुते, खजिनदार भास्कर गोरे, तानाजी काकड, विनायक लिपाणे, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, मुख्याध्यापिका (प्राथ.) मंदा हंडे, मुख्याध्यापक (माध्य.) श्रीकृष्ण पवार, प्रिया जानवे, बापू जानवे आदि उपस्थित होते.
माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले, आपले जीवन समृद्ध करणारे शाळा असते. त्यातून मिळालेले संस्कार हे आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडत असतात. विद्यार्थ्यांनी आपल्या राष्ट्र पुरुषांच्या आदर्श घेतला पाहिजे. त्यांचे चरित्र आत्मसात करुन आपले आयुष्य घडवावे. इतरांनाही मदतीचा भावना ठेवावी. शाळेच्यावतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे असल्याचे सांगितले.
यावेळी वर्षाभरातील विविध परिक्षा, स्पर्धामधील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. अहवाल वाचन मुख्याध्यापिका मंदा हंडे यांनी केले तर प्रास्तविक श्रीकृष्ण पवार यांनी केले. कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका जनाबाई पवार, नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार, पालक प्रतिनिधी सौ.देवगुणे, सौ.सातपुते, आसिफ पठाण, अजय पाटोळे, सर्वश्री साळूंके, शेख आदिंसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी फेसबुक, व्हॅटस्अपवर विवेचन करणारे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील ऐतिहासिक व श्रीराम जन्मोत्सव या विषयांवर विद्यार्थ्यांनी कलाकृतीतून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन संगीता दळवी व स्वाती पवार यांनी केले तर आभार अतुल खांदवे यांनी मानले.