OBC Ahmednagar: ओबीसीची लढाई ही अस्तित्वासाठी आहे-नागेश गवळी
बंधन लॉन्स येथे ओबीसीच्या विविध समाजाची बैठक संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) -मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही. परंतु सरकारने अध्यादेश जारी करुन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा घाट घातला आहे.ओबीसीच्या न्याय हक्कासाठी प्रत्येकाने लढा द्यावा.सरकारने जो अध्यादेश काढला आहे.त्या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी ओबीसी समाजाने मोठ्या प्रमाणात हरकती नोंद कराव्यात.ओबीसी ची लढाई ही अस्तित्वासाठी आहे. असे प्रतिपादन ओबीसी चे प्रवक्ते डॉ.नागेश गवळी यांनी केले आहे.
ओबीसी एल्गार मेळावा नियोजन बैठक सावेडी उपनगर येथील बंधन मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.या बैठकीत विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीत भगवान फुलसौंदर,अभय आगरकर,नगरसेवक बाळासाहेब बोराटे,अंबादास गारुडकर,धनंजय जाधव,रवी सोनवणे,
नागेश गवळी,ज्ञानदेव खराडे बाळासाहेब भुजबळ,अनिल निकम,बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष माऊली मामा गायकवाड,परेश लोखंडे,निलेश चिपाडे,अमोल भांबरकर,डॉ. रणजीत सत्रे,राजू मंगलाराप ,नितीन शेलार,भानुदास बनकर,राजेंद्र पडोळे,रोहित पठारे,मनोज भुजबळ,अनिल इवळे, भाऊसाहेब कोल्हे,खेडकर मामा आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.