Rahuri News | पाच वर्षे काडीचेही काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून माझ्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न – शिवाजीराव कर्डिले

 Rahuri News |  भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा राहुरी तालुक्यात प्रचार दौरा

Rahuri News | पाच वर्षे काडीचेही काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून माझ्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न – शिवाजीराव कर्डिले




नगर: राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात आमदार असताना विकासाची गंगोत्री आणण्यात यश आले होते. सिंचनापासून अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. सत्तेत असलो नसलो तरी विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला नाही. दुर्देवाने मागील पाच वर्षांत मतदारसंघात काडीचेही काम झाले नाही. विकासकामांना खीळ बसली. 


मी आमदार असताना केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचे काम करीत विद्यमान लोकप्रतिनिधी केवळ नारळ फोडत बसले. भावनिक मुद्दयांवर त्यांना एकदा यश आले मात्र आता जनतेच्या भावना बदलल्या असून यावेळी मतदारसंघात परिवर्तन अटळ आहेत. महायुती सरकारच्या कामगिरीवर  जनता खूष असून त्याचे प्रत्यंतर निकालात दिसेल असे प्रतिपादन राहुरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.


      राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर होताच माजी मंत्री कर्डिले यांनी मतदारसंघात प्रचाराला वेग दिला आहे. त्यांनी राहुरी तालुक्यातील डिग्रस, मुळानगर, वरवंडी, बाभुळगाव, धामोरी बुद्रुक, धामोरी खुर्द, खडांबे बुद्रुक, खडांबे खुर्द, वांबोरी स्टेशन, सडे, वाघाचा आखाडा, राहुरी स्टेशन, गावठाण तांदूळवाडी, कोंढवड, शिलेगाव, करपेवाडी, केदळ बुद्रुक, केंद्र खुर्द, चंडकापूर, 


पिंप्री वळण, वळण, मानोरी, आडगाव या गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला. प्रत्येक गावांत मतदारांनी प्रचंड उत्साहात ढोल ताशाच्या गजरात कर्डिले यांचे स्वागत केले. मतदारांशी संवाद साधताना कर्डिले यांनी मतदारसंघाची झालेली दुर्दशा बदलण्याची ग्वाही देत यंदा परिवर्तनासाठी साथ देण्याचे आवाहन केले.


       कर्डिले म्हणाले, संपूर्ण देशाचा विकास केल्यामुळे नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. केंद्र व राज्यात एका विचाराचे सरकार असल्याने सर्वसामान्यांना लाभ होत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, कृषी सन्मान योजना, लाडकी बहिण योजना, विद्यार्थीनींना मोफत उच्च शिक्षण, दुधाला प्रतिलिटर 7 रूपये अनुदान असे अनेक कल्याणकारी निर्णय घेतल्याने जनतेच्या मनात महायुतीबद्दल आपुलकीची भावना आहे. प्रचारा दरम्यान मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद परिवर्तनाची नांदी ठरत आहे.



या प्रचार दौऱ्यावेळी सुरेश बानकर, शरद पेरणे, लिलाबाई तनपुरे, विश्वास तनपुरे, लक्ष्मण तनपुरे, तानाजी धुमाळ, विनीत धुमाळ, उत्तम म्हसे, कडू आप्पा म्हसे, रविंद्र म्हसे, कुंडलिक खिलारी, सुभाष गायकवाड, गोरक्षनाथ तारडे, नाना मानगुडे, विजया मानगुडे, सुरेश गायकवाड, लक्ष्मण आढाव, अनिल आढाव, जालिंदर आढाव, गोविंद आढाव, सुभाष आढाव, राजेंद्र आढाव उपस्थित होते.


 आता दुग्धविकास मंत्री होवून शेतकऱ्यांना न्याय द्या


गावागावात कर्डिले यांचे स्वागत करताना विविध पदाधिकारी, कार्यकर्ते अतिशय उत्साहात होते. शिवाजीराव कर्डिले हे जनतेच्या सुखदु:खात सहभागी होतात. त्यांच्याशी थेट संपर्क साधता येतो. अहमदनगर जिल्हा बँक थेट शेतकऱ्यांच्या दारात नेण्याचे काम त्यांनी केले. दूध धंदा वाढावा, शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडावेत यासाठी त्यांनी गायी म्हशी खरेदीसाठी सहज कर्ज उपलब्ध करून दिले. राज्यात आगामी काळात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. राहुरी मतदारसंघातील जनता कर्डिले यांनाच आमदार करणार असून आगामी सरकारमध्ये दुग्धविकास मंत्री बनून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन वक्त्यांनी यावेळी केले.