Rakhi: अहमदनगर एसीसी सेंटर अँड स्कूलच्या आर्मड कोअर मधील 500 जवानांसोबत राखी साजरी

 Rakhi: अहमदनगर एसीसी सेंटर अँड स्कूलच्या आर्मड कोअर मधील 500 जवानांसोबत राखी साजरी 

Rakhi: अहमदनगर एसीसी सेंटर अँड स्कूलच्या आर्मड कोअर मधील 500 जवानांसोबत राखी साजरी

अहमदनगर (प्रतिनिधी) :

               देशरक्षणाच्या कर्तव्यासाठी आपल्या कुटुंबीयांपासून कोसो दूर असणाऱ्या नगर येथील बन्सी महाराज मिठाईवाला परिवार,विरंगुळवा ग्रुप, तेजस्विनी ग्रुपच्या वतीने अहमदनगरमधील एसीसी सेंटर अँड स्कूलच्या आर्मड कोअर रेकॉर्ड मधील 500 जवानांना राखी बांधून मिठाई देण्यात आली व  रक्षाबंधन साजरे केले.याप्रसंगी आपल्या सख्ख्या बहिणींची उणीव या बहिणींनी भरून काढल्याने उपस्थित अनेक जवानांना गहिवरून आले.

           एसीसी सेंटर अँड स्कूलच्या कृष्ण मंदिरात  हा भावाबहिणीच्या अतूट नात्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.याप्रसंगी देशाच्या विविध प्रांतांतून येथे लष्करी प्रशिक्षणासाठी आलेल्या जवानांच्या मनगटावर  माहिला सदस्यांनी राखी बांधून त्यांचे औक्षण केले व निरोगी दीर्घायुष्याची ईश्वराकडे प्रार्थना केली. 

याप्रसंगी कमांडिंग ऑफिसर कर्नल सुरेंद्र कमार,लेफ्टनन कर्नल एस के महापात्रा,लेफ्टनन कर्नल जगजीत सिंग करकी,मेजर सतीश,मेजर जीएस राठोड उपस्थित होते,यावेळी सुषमा जोशी,साधना जोशी,आस्था  जोशी,अनुराधा थिटे,वंदना शहापुरे,स्वाती दीक्षित, मनीषा कुलकर्णी, कोमल जोशी,जानव्ही  जोशी,लीना जोशी,शोभना कुलकर्णी, मधुरा कुलकर्णी,माधुरी माचवे आदी महिला बन्सी महाराज मिठाईवाले परिवारातील अनेक सदस्या उपस्थित होत्या 

           भारत मातेचे रक्षण करण्यासाठी कुटुंबीयांपासून काही कोस दूर असलेल्या लष्करी जवानांना बन्सीमहाराज मिठाईवाले परिवारमुळे   राखी पौर्णिमा साजरी करण्याचे भाग्य लाभले.त्यांच्या  आनंदात सहभागी होऊन बहिणीच्या आठवणींना उजाळा देणाºया जवानांना हातात राखी बघून बहीण भेटल्याचा आनंद झाला.यावेळी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून राखी बांधण्यात आली व मिठाई देण्यात आली,राखी बांधल्याने आम्हाला खूप चांगले वाटले व आनंद झाला आपण वेळ काढून आला व आमची आठवण ठेवली यासाठी जवानांनी कृतज्ञता व्यक्त केली.  

         बन्सी महाराज मिठाईवाले चे  गोविंद जोशी म्हणाले आम्ही नेहमी समाज उपयोगी  उपक्रम राबवत असतो ,यामध्ये लष्कर पोलीस यांना दिवाळीनिमित्त मिठाईवाटप तसेच वर्षभर इतरही उपक्रम करत असतो, १०० वर्ष आमच्या फर्म ला झाली असून तेव्हापासून आमचे पूर्वज असे उपक्रम राबवित असत आमची ४ थी पिढी ने आज हा उपक्रम घेतला. 

           अतिशय नियोजनबद्ध, आत्मिक समाधान देणारा व देशबांधवांविषयीच्या आत्मियतेने भरलेला असा हा कार्यक्रम  अतिशय आगळा वेगळा मानसिक समाधान देणारा सोहळा होता असे महिलांनी सांगितले.मिल्ट्री मधील शिस्त आपल्याकडून पाळली जाईल का याचीही भीती होतीच परंतु तिथे गेल्यावर मात्र ती भीती नष्ट झाली,त्या सर्व लोकांनी अतिशय आदराने आमचं स्वागत केलं  आणि नंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम चालू झाला खरोखरच खूप आगळावेगळा कार्यक्रम झाला अर्थातच काही गोष्टींची कल्पना नसल्यामुळे आम्ही ही थोडेसे भांबावलो होतो बरेच जण या एरियात प्रथम आल्यामुळे अतिशय आनंदी आणि भावुक झाले होते आपल्या सामान्य लोकांना यांच्या जीवनाविषयी काही कल्पना नसते त्यामुळे सगळेजण भारावले होते  असेही त्या म्हणाल्या