निरंकारी सद्गुरु माताजींनी दिला अहमदनगरमध्ये प्रेमाचा दिव्य संदेश
अहमदनगर (प्रतिनिधी) – ब्रह्मज्ञानाद्वारे परमात्म्याला जाणून जीवनात धारण केल्याने सर्वांभूती त्याचेच दर्शन होऊ लागते आणि सहजच परस्पर प्रेमाची व एकोप्याची भावना जागृत होते. असे शुभभाव निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नगर येथील भिस्तबाग महाल समोरील मैदानावर आयोजित केलेल्या एक दिवसीय विशाल निरंकारी संत समागमात मोठ्या संख्येने उपस्थित मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले.
निरंकारी सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन छत्रछायेखाली आयोजित केलेल्या या निरंकारी संत समागमात अहमदनगर शहर व जिल्ह्या व्यतिरिक्त बीड, उस्मानाबाद, छत्रपती संभाजी नगर, पुणे, सोलापूर, हिंगोली, नांदेड, परभणी आदी भागातून मोठ्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी झाले होते. दिव्य युगुलाच्या साक्षात दर्शनाने सर्वजण आनंदविभोर झाले होते.
सद्गुरु माताजी पुढे म्हणाल्या की, परमात्म्याने अवघ्या सृष्टीची रचना केली असून त्याचे सर्वांवर सारखेच प्रेम आहे. अशा प्रभु- परमात्म्याचा बोध झाल्याने आपल्या मनामध्ये इतरांच्या प्रती असलेले समस्त भेदभाव लयाला जातात आणि आपले मन अधिकाधिक पावन होते.
ब्राह्मज्ञानाद्वारे ईश्वराशी एकरूपता साधल्यानंतर आपल्याला सकळजन या निराकाराचेच रूप दिसू लागतात विविध संस्कृती, पार्श्वभूमी आणि स्वभावात विविधता असूनही संपूर्ण विश्वाचा निर्माता असलेला ईश्वर प्रत्येकावर समानतेने प्रेमभाव जपतो; अशा या ईश्वराची आम्हाला प्राप्ती होते,
तेव्हा आपल्या अंतर्मनातील इतरांप्रती असलेला भेदभाव आपोआपच संपूण जातो आणि आपले मन अधिक निर्मळ आणि शुद्ध होते. जेव्हा आपण ब्रह्मज्ञानाने परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हा या निरंकाराचे रूप दिसू लागतात आणि आमच्या अंतर्मनात सकळांच्या भल्याचीच कामना जागृत होते.
भक्तीचे मर्म सांगताना सद्गुरु माताजी म्हणाल्या की, प्रभूरंगात रंगून भक्तीमय जीवन जगण्याचा प्रत्येक मनुष्याला अधिकार आहे. परमात्मा हा कायमदायम असून तो अपरिवर्तनिय आहे, त्याच्यामध्ये कधीकाळी कोणताही बदल घडत नाही. अशा स्थिर परमात्म्याशी नाते जोडून आपण मानवीय गुणांनी युक्त होऊन याच जन्मी मोक्षाचा मार्ग सुगम करु शकतो.
या संत समागमात विविध ठिकाणाहून आलेल्या भाविक सज्जनांनी कविता, गीत व विचारांच्या ई. माध्यमातून आपल्या भाव प्रकट केल्या, ज्याचा उपस्थितांनी भरपूर आनंद घेतला.
अहमदनगरचे क्षेत्रिय प्रभारी हरीश खुबचंदानी यांनी सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त सांगितले की, आपल्या पावन दर्शनाने आणि अमृत वाणीने उपस्थित सर्व श्रध्दाळू भाविक सज्जन आनंदित झाले असून सर्व संतांच्या वतीने आभार व्यक्त केले व 7 वर्षांच्या दीर्घ खंडानंतर संत समागम होत असून, पुन्हा लवकरच नगरला येऊन दर्शन द्यावे, अशी विनंती सद्गुरु माताजींना केली.
यासोबतच त्यांनी समागम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहयोग दिलेल्या प्रशासकीय यंत्रणांचा व मान्यवर सज्जनांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. खरं तर हा संत समागम एकत्वामध्ये सद्भावनेचा सुंदर संदेश प्रस्तापित करत होता.