पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामकरण ठराव तातडीने शासन दरबारी पाठवल्याबद्दल जाहीर सत्कार संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) नगर-पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामकरण ठराव तातडीने शासन दरबारी पाठवल्याबद्दल प्रशासकीय टीमचा सत्कार पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला आयुक्त पंकज जावळे आणि ठराव समिती सदस्य गण डॉ.प्रदीप पठारे (अतिरिक्त आयुक्त)सचिन बांगर(उपयुक्त) ,मनोज पाखरे(शहर अभियंता),मेहेरे लहारे(आस्थापना प्रमुख), सचिन धस(लेखाधिकारी), विशाल पवार(लेखापरीक्षक)यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थापक, चेअरमन वसंत लोढा व्हाईस चेअरमन सुधीर पगारिया,संचालक मिलिंद गंधे,निलेश लोढा,विकास पाथरकर,शैलेश चंदे,शारदा होशिंग,शैला चंगेडे,बाबासाहेब साठे,सुभाष फणसे,अनिल सबलोक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
वसंत लोढा म्हणाले एक वर्षापासून रेंगाळलेला हा ठराव होता प्रशासनाच्या ताब्यात कारभार आल्यानंतर एका दिवसात आयुक्त व त्यांच्या टीमने मंजूर करून पुढे पाठवला व जिल्हाधिकाऱ्यांनी ही तो लगेच मंत्रालयात पाठवला व लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी नामकरण झालेले असेल असे वाटते चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान केला पाहिजे या भावनेतून आपण या टीमचा सत्कार करत आहोत त्याचबरोबर आयुक्तांनी शहरातील इतर प्रश्नही सोडवावेत अशी मागणी त्यांनी केली.
आयुक्त पंकज जावळे सत्काराला उत्तर देताना म्हणाले आमच्या सत्कार केला त्याबद्दल आभारी आहोत पण ते आमचे कर्तव्य आहे,ही सत्काराची गोष्ट नाही आमचा दैनदिन कामकाजाचा भाग आहे,ती प्रशासनाची जबाबदारी आहे.शहरातल्या बऱ्याच समस्या सुटल्या आहेत,आपल्या सर्वांच्या सहकाऱ्यांनी आजी-माजी पदाधिकारी सह आपण ठोस पावले उचलू व नगर शहराला सुंदर रूप देऊ असेही ते म्हणाले.
पोपटराव पवार म्हणाले या कार्यक्रमाला येण्याचा उद्देश म्हणजे अहिल्यादेवी होळकर या राज्यकर्त्या होत्या त्याचबरोबर त्याचे पाणी व्यवस्थापन खूप चांगलं होतं,त्यांचं नाव आपल्या जिल्ह्याला दिला जात आहे म्हणून म्हणून उपस्थित राहण्याचा आनंद वाटतो.आपल्या जिल्ह्यात त्यांचा जन्म झालेला आहे पण नाव दिल्याने आपली जबाबदारी वाढलेली आहे. आपल्याकडल्या नद्या आता नाले झाले आहेत सीना नाला व भिंगार नाला झाला आहे.
चाळीस वर्षांपूर्वी दुष्काळामध्ये यांचे पाणी पिण्यायोग्य होते व येथील काठावरच्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत होते,पण आज जर पाहिली तर पूर्णता ते पाणी अशुद्ध आहे ह्या नद्या ज्या वेळेस वाहतील त्यावेळेसच अहिल्यानगर आपण अभिमानाने नाव घेऊ शकू असेही ते म्हणाले.
कार्यक्रमास बाळासाहेब भुजबळ,सुरेश शिरसगर क्षीरसागर,सुहास पाथरकर,तुषार पोटे, बापू ठाणगे, नवनाथ चिंतामणी,दिगंबर गेंटयाळ,अजय गुगळे,सतीश विश्वरूप,शेखर गांधी ,श्रीकांत गायकवाड,विनायक दिकोंडा,दिलीप पाटील,शामराव वागस्कर,गोकुळ काळे, संजय वल्लाकट्टी आदीसह अनेक जण उपस्थित होते.