चौथ्या सोमवार निमित्त बेलेश्वर केबल नेटवर्क व साईबा अमृततुल्यच्या वतीने महाप्रसाद वाटप
अहमदनगर । दर्शक :-
हिंदू धर्मातील पवित्र समजला जाणारा महिना म्हणजे श्रावण महिना असून श्रावण महिन्यामध्ये हिंदू संस्कृती प्रमाणे अनेक व्रतवैकल्य केले जातात. श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवाराला अधिक महत्त्व असून या काळामध्ये शहर परिसरातील शिवमंदिरे भाविकांनी गजबजलेली पाहायला मिळतात
अहमदनगर शहराजवळच असणार्या बेलेश्वर या ठिकाणी देखील चौथ्या सोमवार निमित्त बेलेश्वर केबल नेटवर्क व साईबा अमृततुल्य यांच्यावतीने बेलेश्वर या ठिकाणी व महादेवाची महाआरती करू महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी 300 किलो सफरचंद यावेळी वाटप करण्यात आले. सुमारे 3 हजार भाविकांनी लाभ घेतला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तुषार यादव, राजेंद्र राऊत, सांगळे मामो, चंद्रकांत भोंगे, शरद महादर, रमाकांत गंगापूरकर, अनंत शुक्ल, चंद्रकांत वराडे, संजय बुलबुले,
राजेंद्र तागड, दिलीप धुतारे, बालू जपकर, वैभव काजळकर, स्वनील यादव, अमित करे, सुशील थोरात, प्रशांत पाटील, गणेश वडेपिल्ली, दिनेश यादव, स्वराज्य यादव व मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.