Solo Corus: सोलोकोरस म्हणजे साध्या माणसांचा बोलका प्रवास – साहिल कबिर

 Solo Corus: सोलोकोरस म्हणजे साध्या माणसांचा बोलका प्रवास – साहिल कबिर

Solo Corus: सोलोकोरस म्हणजे साध्या माणसांचा बोलका प्रवास - साहिल कबिर



Solo Corus: अहमदनगर (प्रतिनिधी) : सकल भारतीय समाज अहमदनगर शाखेच्या वतीने शहरातील रहेमत सुलतान हॉल येथे साहिल कबिर यांच्या बोलू ‘सोलोकोरस’वर या बोलणाऱ्या लिहिणाऱ्या साध्या माणसांच्या कहाण्या ऐकण्यासाठी जमलेल्या लोकांसमोर ते बोलत होते.

यामधील अब्दुल्या हा शाहरूख, सलमान किंवा नक्वी हुसेनवाला अब्दुल्या नाही तर रस्त्यावरचा आहे, गल्लीत रांगुन गुणदोषासह वयानं वाढलेला धडपडणारा, कष्टनाऱ्या समूहातला असूनही एकटाच आहे. यात गावसंस्कृती म्हणजे पुर्वजांपासून विभिन्न लोकाचार जपत आयुष्य कंठणाऱ्या लोकांची दैनंदिनी आहे. आज अब्दुल्या आहे उद्या कुणी दुसरा बाप्या बाई असेल, तसे होऊ नये म्हणून शेवटाला ठेऊन ठेचल्या जाणाऱ्या धर्माचा नव्हे तर समूहाचा बेतरतीबी आवाज म्हणजे सोलोकोरस होय.

यावेळी सुरवातीला सोनाली देवढे-शिंदे यांनी सकल भारतीय समाजाची भूमिका विशद केली. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, ‘धर्म आणि जातींच्या अस्मिता टोकदार बनून सामान्य माणसाला जगणे मुश्कील करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीय नागरिकांना दिलेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी सकल भारतीय समाज कटिबद्ध आहे. म्हणून लोकशाही उत्सवापासून ते साहित्य संमेलनापर्यंत विविध उपक्रम राबविले जातात. 

त्याचाच एक भाग म्हणून आज सोलोकोरस वर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. प्रा. डॉ. महेबूब सय्यद यांनी सोलोकोरस मागील लेखकाचा दृष्टीकोन स्पष्ट करत साहिल कबिर यांचा परिचय करून दिला. 

त्यानंतर ख्यातनाम नाट्यकर्मी राहुल लामखडे यांनी सोलोकोरस मधील पुराचं चित्रण करणाऱ्या, कोरोना काळाचं चित्रण करणाऱ्या सर्वसामान्य मुस्लिमांची यासारखी काही स्वगतं सादर केली. केवळ आवाजाच्या माध्यमातून त्यांनी कष्टणारा माणूस लोकांच्या डोळ्यासमोर उभा केला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला युनूसभाई तांबटकर यांच्या हस्ते राहुल लामखडे यांचा तर संध्या मेढे यांच्या हस्ते साहिल कबिर यांचे स्वागत करण्यात आले. सुत्रसंचालन अतुल सातपुते तर आभार कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजि. अभिजित एकनाथ वाघ, आसिफखान दुलेखान, अशोक सब्बन, संतोष गायकवाड आदींनी प्रयत्न केले. डॉ. प्रशांत शिंदे, फिरोज शेख, नितेश बनसोडे, दिपक नेटके, तुषार सोनवणे, अतुल देठे, कवयित्री सरोज आल्हाट, पत्रकार आबेदखान दुलेखान, सुयोग देवढे आदी मान्यवर उपस्थित होते.