एक झाड T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी…. या संकल्पनेतून पद्मशाली सोशल फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपण
समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक – शुभम सुंकी
अहमदनगर (प्रतिनिधी) : समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असून तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे तसेच वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.
त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. झाडे हवेतील कार्बनडाय ऑक्साइड शोषून शुद्ध ऑक्सिजन निर्माण करतात असे प्रतिपादन पद्मशाली सोशल फाउंडेशन चे सदस्य शुभम सुंकी यांनी वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी केले.
एक झाड T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी आणि T20 विश्वचषक जिंकल्याचा जल्लोष म्हणून श्री मार्कंडेय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय,श्रमिकनगर, सावेडी अहिल्यानगर येथील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पद्मशाली सोशल फाउंडेशनचे शुभम सुंकी बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल अलवाल उपस्थित होते.
अभियानात T20 विश्वि चषक ज्या प्रकारे 20 षटक असतात तेवढेच म्हणजे एकूण 20 वृक्ष लावण्यात आले. झाडांचे संगोपन करणे तितकेच महत्वाचे आहे.’’वृक्ष लागवडीच्या सुरुवातीला पर्यावरण रक्षणाची शपथ सर्वांच्या उपस्थित घेण्यात आली. अभियानात पोलीस उपनिरीक्षक अनिल अलवाल, शुभम सूंकी, श्रीनिवास बुरगुल ,अक्षय अन्नम , अक्षय यन्नम , आदित्य यन्नम सर्वांनी उपस्थित राहून आपला सहभाग घेतला.
या उपक्रमासाठी नगरसेवक मनोज दुलम यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी या वृक्षांच्या संरक्षणासाठी 20 कुंपण उपलब्ध करून दिले.