Tulsi Vivah: स्वच्छता, सामाजिक एकोपा जपत तुळशी विवाह संपन्न

 Tulsi Vivah: स्वच्छता, सामाजिक एकोपा जपत तुळशी विवाह संपन्न

Tulsi Vivah: स्वच्छता, सामाजिक एकोपा जपत तुळशी विवाह संपन्न


    Tulsi Vivah:  अहमदनगर (प्रतिनिधी) – पद्मानगर, सावेडी, अहमदनगर येथील महिलांनी एकत्र येऊन सामुदायिक तुळसी विवाह सोहळा साजरा करत सामाजिक सलोखा व एकोपा जपला. यावेळी सर्वांनी एकत्र येत संपूर्ण गल्लीची स्वच्छता करण्यात आली, सडा घालून रांगोळ्या काढण्यात आल्या.


     यावेळी नीता संतोष उकिर्डे, अलका संदिप मुळीक, रेखा धिरज उकिर्डे, अंबिका शिवराम वल्लाकट्टी, पूजा प्रसाद खटावकर, हिराबाई विक्रम जाधव, श्वेता सागर कुरी, सुजाता अंबादास कुरी, सोनाली लखन आडेप, निर्मला किसन कोतकर, आशा मारुती वाबळे, झुंबरबाई मारुती दिघे, बबई सूर्यभान जाधव, प्रतिभा सुरज उकिर्डे, बेग,व्यवहारे, निकिता निरंजन वाबळे, अश्विनी उमेश कोतकर या महिलांनी सहभाग घेतला. 


     यावेळी गल्लीतील बालगोपाळ व पुरुष मंडळी उत्साहाने सहभागी झाली. महिलांनी उखाणे घेत आनंद साजरा केला. दरवर्षी सामुदायिक तुळशी विवाह सोहळा साजरा करताना फटाके विरहित व प्रदूषणमुक्त साजरा करण्याचे ठरले. सारभात व लापशीचा आस्वाद घेवून कार्यक्रम संपन्न झाला.