Vasant Tekdi: जिद्द, ध्येय, मनाशी बाळगून विद्यार्थ्यानी प्रयत्न केल्यास यश निश्चित- रेश्माताई आठरे

 Vasant Tekdi: श्रीनाथ विद्या मंदिरचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

Vasant Tekdi: जिद्द, ध्येय, मनाशी बाळगून विद्यार्थ्यानी  प्रयत्न केल्यास यश निश्चित- रेश्माताई आठरे


     Vasant Tekdi:  अहमदनगर (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांनी सदैव प्रयत्नशील रहावे, जिद्द, ध्येय मनाशी बाळगून प्रयत्न करत पुढील वाटचाल करीत रहा  आपले प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाहीत. यश हे निश्चित मिळते. दुसर्याच्या आनंदाच कारण बनता आलं की आपल्या चेहर्यावरील हसू कायम अबाधित राहते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्माताई आठरे यांनी केले.


     वसंत टेकडी येथील श्रीनाथ विद्या मंदिरच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रेश्माताई आठरे, माजी नगरसेविका संध्याताई पवार, रुपालीताई वारे, ज्योतीताई गाडे, सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आर.डी.बुचकुल, सहसेक्रेटरी आर.ए.देशमुख, साई पाउलबुधे, प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, अनुराधा चव्हाण, सविता सानप, प्राचार्य डॉ.निलेश जाधव, भरत बिडवे, संदिप कांबळे, मुख्याध्यापिका अनिता सिद्दम, शिक्षकवृंद उपस्थित होते.


     रेश्माताई आठरे यांनी स्व.डॉ.नाथ पाउलबुधे यांच्या सहवासात मी वाढले, त्यांचा आदर्श घेत अपुर्वा कॉम्प्युटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत सर्वसामान्य कुटूंबातील मुलांना शिक्षण देत आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करा, पण त्यांच्यावर पालकांनी दडपण टाकू नका. विद्यार्थ्यांना मोबाईल देण्यापेक्षा पुस्तके द्या. वाचन संस्कृती टिकवा, या शाळेची गुणवत्ता चांगली असुन सुद्धा डोनेशन न घेता शिक्षण मिळते हे कौतुकास्पद आहे असे श्रीमती आठरे म्हणाल्या.


     यावेळी रुपालीताई वारे यांनी विद्यार्थ्यांना गोष्टी सांगून जीवनात कला-गुणांचे महत्व विषद केले. प्राथमिक शाळेतूनच मुलांना संस्कार मिळत असतात. संध्याताई पवार, ज्योतीताई गाडे यांनी शिक्षणाचे महत्व सांगून स्पर्धेमुळे आत्मविश्वास वाढतो असे सांगितले.


     प्रास्ताविकात मुख्याध्यापिका अनिता सिद्दम यांनी सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबर विविध उपक्रम राबविले जात आहेत.  संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे व सर्व विश्वस्तांचे सहकार्य मिळते असल्याने चांगले विद्यार्थी या विद्यालयातून घडत आहेत. आज अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत, याचा आनंद होत असल्याचे सांगितले.


     यावेळी काव्य संग्रह गगनभरारी, हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रबोधिनी राम पठारे या इ. 7 वी च्या विद्याथिनीच्या ‘बाप मला कळलाच नाही…’ या कवितेने उपस्थितांचे डोळे पाणावले.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मंगला ससे यांनी केले तर आभार एम.एन.यन्नम यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.