श्रमिक बालाजी देवस्थानच्यावतीने सव्वा रूपयात सामुदायिक विवाह
अहमदनगर (प्रतिनिधी)-मधील श्रमिक नगर येथील श्रमिक बालाजी देवस्थानच्या ३१ व्या वार्षिक महोत्सवा निमित्त व्यकंटेश्वर कल्याणम सोहळा शनिवार १५ ऑगस्ट रोजी दुपारी संपन्न होणार आहे.त्याच सभामंडपात सव्वा रूपयात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.या सोहळ्यामध्ये हिंदू धर्मातील सर्व जातीच्या वधू-वर याना सहभागी होता येईल.
सामुदायिक विवाह ही काळाची गरज आहे,दिवसेदिवस विवाह सोहळयाकरीता लागणारा खर्चही वाढत आहे.यामुळे गोरगरीबांना विवाह समारंभ करणे परवडत नाही.गोरगरीब व सर्व जाती बांधवाचे हित हा उददेश डोळ्यासमोर ठेवून टस्ट हा उपक्रम गेली १२ वर्षे दरवषी सातत्याने करण्यात येत आहे आहे.
आतापर्यंत २०० च्या वर विवाह या माध्यमातून झाले आहेत.. त्यासाठी इच्छुकांनी विवाहसाठी लागणारे कागदपत्रे सह आपली नावे दि ७ ऑगस्ट पर्यत श्रमिक बालाजी मंदिरात सायं ६ ते ९ या वेळेत नोंदवावीत, यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला,आधार कार्ड झेरॉक्स तसेच मुलाचे वय २१ वर्षे व मुलीचे वय १८ वर्षे पुर्ण आवश्यक,
जर अंतर जातीय विवाह असेल तर आई-वडीलांची संमती पत्रक असणे आवश्यक,मुलाचे व मुलीचे पासपोर्ट साईज फोटो प्रत्येकी दोन, रेशन कार्ड, आधार कार्ड व फोटो असलेले ओळखपत्र झेरॉक्स प्रत,१०० रुपयाचे स्टॅम्प पेपर ,प्रत्येकी २ साक्षीदार.वरील सर्व कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे.
सोहळयाचा उपक्रम संस्थेच्या वतीने श्री श्रमिक बालाजी मंदिरात करण्यात येईल या सामुदायिक विवाहात जास्तीत जास्त वधू वरांनी सहभाग घ्यावा. इच्छुकांनी आपली नावे बालाजी मंदिरात नोंदवावीत असे आवाहन श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्था(ट्रस्ट)वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी मनोज भाऊ दुलम,विनोद म्याना मो ९८५०६७७७७४,नारायण यन्त्रम मो. ९४२०८०२०१०, किसनराव बोमादंडी मो.९९७५३९४४६० ,अंबादास महेसुनी मो.९६५७६१०९१२, ज्ञानेश्वर सुंकी मो.९८९०८७४९४८,गणेश येमुल मो.९४२३७५०७४८ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे