Ward No 6: नगरसेविका सौ.वंदना ताठे यांच्या प्रयत्नातून व खा. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून शिंदे मळा, शोभा कॉलनीतील ड्रेनेज लाईन व डांबरीकरण कामांचा शुभारंभ
Ward No 6: अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रभागातील प्रत्येक भागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनपा तसेच विविध निधीच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत ते सोडविली आहे. पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ.सुजय विखे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन घेत प्रभागातील कामे मार्गी लावण्यात येत आहे.
नागरिकांच्या सहकार्यातून प्रत्येक भागातील ड्रेनेज, पिण्याची लाईन, रस्ते, स्ट्रीट लाईट असे प्रश्न सोडविण्यात आले आहेत. विविध विकास कामांमुळे प्रभागाचा चांगला विकास झाला होत आहे. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर शहरात मोठ-मोठी विकास कामे होत आहेत, त्याचबरोबर प्रभागातील कामांनाही निधी उपलब्ध करुन देत तीही मार्गी लागत असल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन नगरसेविका वंदना ताठे यांनी केले.
प्रभाग क्रमांक सहाच्या नगरसेविका सौ.वंदना ताठे यांच्या प्रयत्नातून व खासदार सुजय विखे पाटील यांच्या निधीतून शिंदे मळा, शोभा कॉलनीतील ड्रेनेज लाईन व रस्ता डांबरीकरण कामांचा शुभारंभ जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेविका वंदना ताठे,
नगरसेवक रवींद्र बारस्कर, नगरसेविका पल्लवी जाधव, सुलभा कोकले, प्रमोदिनी औटी, हेमलता पगार, कल्याणी नागपुरे, पुष्पा मुथा, दया पोहक, विलास ताठे, अरुण शिंदे, राजेंद्र जेऊकर, संजय गोरे, गणेश अगरवाल, नितीन भगत, संभाजी साबळे, जिनेश चोकटे, डॉ शाशिकांत उदास, डॉ. विवेक देशपांडे, अप्पा ठाणगे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बाबासाहेब वाकळे म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगर विकासाचे स्वप्न पुर्ण होत आहे. पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या विकासनशिल दृष्टीकोनातून शहराचा चेहरा-मोहरा बदल आहे. प्रत्येक भागासाठी निधी उपलब्ध करुन देत नागरिकांना प्रश्न सोडवत दिलासा देण्याचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक डॉ.शशिकांत उदास म्हणाले, नगरसेविका वंदनाताई ताठे व त्यांचे सहकार्य नगरसेवक हे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम तत्पर असतात. आज शुभारंभ होत असलेल्या ड्रेनेज लाईन व डांबरीकरणामुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचे सांगत त्यांना धन्यवाद दिले.