गारदे कुटुंबीयांची सेवा निश्चितच कौतुकास्पद – मा.शिवाजीराव कर्डीले
अहमदनगर (प्रतिनिधी) : लक्ष्मीबाई महिला वसतिगृह अहमदनगर शहरातील मध्यवस्तीत असलेले मुलींसाठी उत्कृष्ट व्यवस्था असलेले ठिकाण आहे.सामाजिक सेवेचा ध्यास घेतलेले अनंतराव गारदे व त्यांच्या धर्मपत्नी सौ रमा गारदे यांनी सुरु केलेले मुलींचे हे वसतिगृह व व्यवस्थापन पाहून आपन भारावून गेलो त्यांच्या व्यवसायातून अगदी वाजवी दरात मुलींना राहणे आणि खाण्याची उत्तम व्यवस्था ही एक सेवाच आहे त्यांचे हे कार्य इतरांनी अनुकरणीय करण्यासारखे असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून शिवाजीराव कर्डिले यांनी गारदे कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या छोटे खानी कार्यक्रमात हजेरी लावली.यावेळी कर्डीले यांनी त्यांचे व गारदे कुटुंबियांचे वर्षांनुवर्षे स्नेह संबंधांना उजाळा दिला.
शहरात उभारलेल्या मुलींसाठीच्या वसतिगृहाची पाहणी केली आणि याठिकाणी राहणाऱ्या मुलींशी संवाद साधून येथील व्यवस्थेविषयी चर्चा केली. वास्तव्यास असलेल्या मुलींनी म्हटले कि आपल्या राहत्या घरात मिळत नसतील त्यापेक्षा अधिक सेवा आणि सुविधा आणि गारदे कुटुंबीयांनी आपल्याला दिलेले प्रेम आणि वागणूक आम्ही आयुष्यात विसरणार नाही. असे गौरवदगार ऐकून शिवाजीराव भारावले आणि गारदे कुटुंबीयांची सेवा निश्चितच कौतुकास्पद असून अनुकरणीय असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचा सत्कार अहमदनगर शहर राष्ट्रवादी उद्योग सेलचे अध्यक्ष आणि क्रांतिकारी राणी लक्ष्मीबाई महिला वस्तीगृहाचे संचालक अनंतराव गारदे यांनी केला यावेळी सौ.रमा गारदे ,पत्रकार रियाज शेख,सचिन गारदे,नितीन गारदे,वसतिगृहातील मुली आदी मान्यवर उपस्थित होते.