राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नगर -डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून ओळखले जातात. डॉ. आंबेडकर हे केवळ आदरणीय नेतेच नव्हते तर एक विचारवंत आणि सुधारक देखील होते तसेच ते अर्थशास्त्रज्ञ, मानववंशतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ, मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, कायदे पंडित, राजनीतिज्ञ, नीतिशास्त्रज्ञ, घटनाशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, पुरातत्वशास्रज्ञ, निर्बंधतज्ञ, महान न्यायवादी पत्रकार, थोर तत्वज्ञानी, सर्वात महान विद्याव्यासंगी,थोर बुध्दिमानी, अस्पृश्योध्दारक, स्री-उध्दारक, कामगार हितचिंतक, महान ग्रंथप्रेमी, महान लेखक आणि साहित्यिक होते असे प्रतिपादन माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दीना निम्मित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते त्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी माजी नगरसेवक संजय झिंजे, रोहन शेलार, चंद्रकांत उजागरे,राहुल घोरपडे ,अभिषेक जगताप ,अविनाश ठोंबरे ,राहुल लोखंडे ,ऋषिकेश शेटे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
कळमकर पुढे म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा पुरस्कार करण्यासाठी आणि जाती-आधारित भेदभाव निर्मूलनासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी शोषितांना सशक्त करण्यासाठी शिक्षण, नोकरी आणि राजकारणात आरक्षणाचा पुरस्कार केला.
दलितांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले. डॉ. आंबेडकरांनी 1923 मध्ये शोषितांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. त्यांनी जातीच्या उतरंडीला आव्हान देण्यासाठी महाड मार्च आणि काळाराम मंदिरातील मंदिर प्रवेश आंदोलन (1930) यांसारख्या चळवळींचे नेतृत्व केले. 1932 च्या पूना करारात आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने दलितांसाठी राखीव जागांसह स्वतंत्र मतदारसंघ बदलले असेही ते म्हणाले