Ganesh Jayanti: गणेश जयंतीनिमित्त श्री एकदंत गणेश मंडळाच्या 102 युवकांचे रक्तदान
अहमदनगर (प्रतिनिधी)– सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेश जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोज करण्यात आले. यंदा रक्तदान शिबीरात श्री एकदंत गणेश मंडळाच्या 102 युवकांनी उत्सर्फुतपणे रक्तदान केले. श्री एकदंत गणेश मंदिरात मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून या शिबिरात सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉ.सुनिल महानोर म्हणाले कि, 20 वर्षापासून मंडळाने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन आज श्री एकदंत गणेश मंडळाने शहरात नाव कमवले आहे. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा. रक्त कुठे ही तयार होत नाही, माणसालाच रक्तदान करावे लागते. त्यामुळे आपल्या कडून होईल तितक्या प्रमाणात रक्तदान शिबीर भरवावे, जेणे करुन येणार्या संकटाला सामोरे जाताना रक्तदानाची अडचण निर्णाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने आपण कोणाला तरी जीवनदान देतो, याचा आनंद मोठा आहे. रक्तदान प्रत्येकांने वर्षातुन एकदा करावे. रक्त हे कोणत्या फॅक्ट्रीत तयार होत नाही. गरज भासल्यास कोणी तरी रक्तदान करावेच लागते, या उद्देशानेच मंडळाच्यावतीने गेल्या 20 वर्षापासून रक्तदान शिबीर भरविण्यात येत आहे, असे मंडळाच्यावतीने सांगून गणेश जयंती निमित्ताने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यंदा या सोहळ्यात एक जोडपी विवाहबद्ध होणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले.
धार्मिक कार्यक्रमाबरोबरच मंडळाने सामाजिक कार्यक्रमही घेतले आहेत. यंदा रक्तदान शिबीरात श्री एकदंत गणेश मंडळाच्या 102 युवकांनी उर्त्फुतपणे रक्तदान केले. यामध्ये 6 महिलांचा सहभाग आहे.या रक्तदान शिबीरात दातरंगे मळा परिसरातील नागरीकांसह नगर शहर परिसरातील युवकांनी व महिलांनी सहभाग घेतला. यावेळी 150 महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. या शिबीराला आनंदऋषीजी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी एकदंत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व एकदंत महिला मंडळाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीनिवास बुरगुल यांनी केले. तर आभार चंद्रकांत बेत्ती यांनी मानले.