July 7, 2026

अगस्ती महाविद्यालयात ५२ व्या वर्धापन दिन व वनमहोत्सव सोहळा उत्साहात

0
image - 2026-07-02T193309.619.jpg

 वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अगस्ती महाविद्यालयात ५२ व्या वर्धापन दिन व वनमहोत्सव सोहळा उत्साहात






नगर : दर्शक । दि २ जुलै २०२६ । 

अगस्ती कला, वाणिज्य आणि दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयाच्या ५२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आणि निसर्गाप्रती आपली जबाबदारी ओळखून, महाविद्यालयात नुकताच अत्यंत उत्साहात ‘वन महोत्सव’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भव्य वृक्षारोपण मोहिमेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पर्यावरण रक्षणाचा संकल्प करत महाविद्यालयाचा ५२ वा वर्धापन दिन अतिशय अर्थपूर्ण पद्धतीने साजरा झाला.




         कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिवाजी खेमनर यांनी भूषवले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती, अकोले येथील शिक्षण विभागाचे गणेश घोलप आणि विलास पठाडे उपस्थित होते.




          कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, वाढते प्रदूषण आणि बदलत्या हवामानाच्या काळात झाडे लावणे आणि ती जगवणे ही केवळ एक औपचारिकता नसून, ती काळाची गरज आहे. ५२ वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये केवळ शिक्षणाचीच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीची बीजेही पेरली आहेत, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.




या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य चांगदेव डोंगरे, पर्यवेक्षक विवेककुमार वाकचौरे, जीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वाघमारे, तसेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष महेश पाडेकर, रामदास मुर्तडक,संतोष आवारी,सतीश काळे,रविंद्र शिंदे,साहिल पठाण,सुरेश वाकचौरे, संतोष औचिते यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) कार्यक्रम अधिकारी विकास निमसे व महेश पाडेकर यांनी केले.


  विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाविद्यालयाचा वर्धापन दिन आणि वनमहोत्सव या दुहेरी उत्सवासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वयंसेवकांनी परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आणि त्यांच्या संगोपनाची शपथ घेतली.



            या उपक्रमामुळे अकोले परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात एक सकारात्मक संदेश गेला असून, पर्यावरणाप्रती जागरूकता निर्माण करण्यास मोठी मदत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *